Sunday 23 December 2018

" सरकारचा दुटप्पीपणा ...तुषार म्हस्के "

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब जरा विचार करा ..” शेतकऱ्यांनी ऊस लावू नका, साखरेचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. ती आणखी जास्त झाली तर ती समुद्रात टाकण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे सांगली येथे बोलताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान ह्या देशात साखर जास्त झाल्यामुळे पाकिस्तानने साखर भारतात निर्यात केली . पण, आपल्या भारतात असणार प्रकरण उलट आहे. इथे उत्पन्न झाल्यावर शेतकऱ्यांना उत्पन्न बदलण्याचा सल्ला  आपण देतात.

एका बाजूला हिंदू राष्ट्रवाद , दुसऱ्या बाजूला पाकिस्तान हा दुश्मन आणि मागून हात मिळवणी. चांगल आहे जनता आपली मुर्खासारखी राष्ट्रभक्ती च्या नावाखाली एकमेकांच्या मानेवर सुरी आणि चाकू ठेवते.



साखरेच प्रमाण जास्त होणारच ना !  गडकरी साहेब कारण  , केंद्र सरकारने जास्त प्रमाणात साखर पाकिस्तान हून मागवली आहे. म्हणजे बळीराजाच्या हक्काच्या नावाने अनेक योजना आणायच्या दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच पिक व्यवस्थित झाल्यावर बाहेरच्या देशातून भारतात माल मागवायचा म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हामि भाव कसा मिळेल. पिक चांगल येत नाही म्हणून मारामार आणि पिक चांगलं झाल्यावर सरकारचा मार .

साखरेचा साठा मोठ्या प्रमाणात झाला हि , काही शेतकऱ्यांची चूक नाही  . ह्यावेळी , शक्य होत साखरेला योग्य भाव मिळेल.केंद्र सरकारने साखर  पाकिस्तानातून आणण्याची गरज नव्हती. सर्जिकल स्ट्राईक चा वर्धापन साजरे करणारे सरकार पुन्हा पाकिस्तानातून साखर निर्यात करते. जनतेची राष्ट्रवादाच्या नावाखाली दिशाभूल करायची आणि मित्रता शासनाने जोपासायची.

दिनांक २३ डिसेम्बर, २०१८ ला सांगली येथे झालेल्या नितीन गडकरी यांच्या भाषणात आलेला साखरे बाबत विषय हा न पटणारा वाटतो . कारण ,  शासनाची जबाबदारी आहे भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण. इथे , भूमिपुत्र राहतात बाजूला आणि सल्ले मिळतात कारण नसताना ....

रंगकर्मी 
तुषार म्हस्के

No comments:

Post a Comment