Thursday, 16 July 2026

"रंगभूमीसाठी... विचार, मनन, चिंतन आणि दिवसातील २४ तास फक्त रंगकर्म !

 "रंगभूमीसाठी... विचार, मनन, चिंतन आणि दिवसातील २४ तास फक्त रंगकर्म ! 

नाशिक येथील चिखलवाडी येथे ८ ते १२ जुलै २०२६ या कालावधीत "रंगभूमी: सृजन आणि संवर्धन कार्यशाळा" संपन्न झाली. ही कार्यशाळा रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी उत्प्रेरित केली.

रंगभूमी हा सृजनेचा जिवंत झरा आहे. ती कलाकारांना जीवनदान देते आणि समाजाला नवी दिशा दाखवते. रंगभूमी ही खरंतर विचारांची भूमी आहे. अनेक कलाकार या रंगभूमीवर येतात; रंगभूमी त्यांना नाव देते, त्यांचे अस्तित्व निर्माण करते आणि त्यांना एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाते. कलाकाराला नाव, पैसा, प्रसिद्धी हे सगळं रंगभूमीमुळेच मिळतं. पण जेव्हा हे कलाकार मोठे होतात, तेव्हा ते या रंगभूमीला काय परत देतात? रंगभूमीच्या निर्मितीसाठी आणि ती निरंतर कार्यान्वित राहण्यासाठी ते काय करतात? हे महत्त्वाचे प्रश्न आज समोर उभे ठाकले आहेत.




गेल्या ३४ वर्षांपासून 'थिएटर ऑफ रेलेवंस' हा नाट्य सिद्धांत रंगभूमीला जिवंत ठेवण्यासाठी सृजनेचा झरा बनला आहे. रंगभूमी जनमानसात पोहोचवण्यासाठी या माध्यमातून सातत्याने प्रयोग होत आहेत. रंगभूमीच्या निर्मितीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे 'प्रेक्षक'. समाजातील तळागाळातील वर्ग, मध्यमवर्ग आणि उच्च वर्ग अशी कोणतीही भिंत न ठेवता, प्रेक्षक-संवादाच्या माध्यमातून सर्वांना एका मंचावर, एका समपातळीवर आणण्याचे काम हा सिद्धांत करतो; त्यांच्यामध्ये माणुसकीचा बोध निर्माण करतो आणि त्यांचा विवेक जागृत करतो.

रंगकर्मी हा स्वतः जगलेले क्षण किंवा समाजात घडणाऱ्या घटनांना पुन्हा जिवंत करून, एक व्यापक दृष्टी ठेवून कला सादर करत असतो. आपल्या कलेचा हाच बोध त्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा असतो. या प्रक्रियेसाठी कलाकाराने सतत जागरूक राहून निरीक्षण (Observation) करणे आवश्यक आहे. ते क्षण जगत असताना कलाकाराच्या आत निर्माण होणारे भाव, त्यातून घडणारी कृती (Action) आणि मिळणारा बोध हे समजून घेणे गरजेचे असते.

"रंगभूमीसाठी... विचार, मनन, चिंतन आणि दिवसातील २४ तास फक्त रंगकर्म !

या कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी आम्ही एका ओढ्यात गेलो. पाण्यात पाय ठेवताना होणारा पाण्याचा स्पर्श आणि अंगावर आलेले शहारे, हे माझे नैसर्गिक भाव जागृत करत होते. हे भाव मला माझ्या स्वतःशी जोडत होते, मला एकरूप करत होते. संपूर्ण पाण्यात बुडताना होणारा तो स्पर्श माझ्यातील व्यक्तीला आणि कलाकाराला 'प्रवाहित' राहण्याचा संदेश देत होता. निसर्गाचा हा प्रवाह कधीच थांबत नाही, तो नेहमी प्रवाही असतो. मग मी माझ्या भावनांचा आणि विचारांचा प्रवाह का थांबवला आहे? निसर्गाप्रमाणे मी स्वतःला प्रवाही का ठेवत नाही? हा प्रश्न मला पडला आणि क्षणात माझ्यातील 'अहं' गळून पडला. मी स्वतःहून पुढाकार घेऊन परफॉर्म करू लागलो. या सादरीकरणाच्या प्रवासात एक कलाकार म्हणून मला जे महत्त्वाचे सूत्र गवसले, ते म्हणजे "निरीक्षण आणि स्पर्श" (Observation and Touch).




जन्म ते मुक्ती हा प्रवास आपण सगळेच करतो, पण तो करताना आपल्याला त्याची खरी जाणीव असते का? कारण हाच प्रवास आपल्या अस्तित्वाची पायवाट निर्माण करतो, जी येणाऱ्या पिढ्यांना रस्ता दाखवते. चैतन्य अभ्यास करण्यासाठी आम्ही निसर्गाच्या सानिध्यात गेलो. तिथे जाण्यापूर्वीचा रस्ता, वाटेत येणाऱ्या अडचणी आणि आव्हानांना तोंड देताना मी घेतलेली काळजी... या सगळ्यावरून मला एक जाणवले की, मी आयुष्यात फक्त पळतोय की या प्रवासाचा आनंद घेतोय? आयुष्यातील चढ-उतार, वळणे आणि खाचखळग्यांतून जाताना येणारा अनुभव मी खऱ्या अर्थाने जगत आहे, याची तीव्र जाणीव मला नदीच्या पात्रातून चालताना झाली. दगडांवरून चालताना पाय घसरत असतानाही अत्यंत सावधपणे टाकलेली पावले मला जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याचा मार्ग दाखवून गेली. एखादा मोठा दगड समोर आला तरी त्याला भेदून पाणी जसे पुढे निघून जाते आणि नदी आपली वाट निर्माण करते, तसेच आपल्यालाही पुढे जायचे आहे.

सतत प्रवाहित राहणं म्हणजेच अधात्म आहे. 


नदीच्या पात्रात झोपल्यावर मला जाणवले की, सुरुवातीला थंड वाटणारे पाणी काही काळाने उबदार भासू लागले. डोळे बंद करून आकाशाकडे तोंड करून झोपलो असताना मला वाटले की, मी संपूर्ण आकाश माझ्या डोळ्यांत सामावून घेतले आहे. बंद डोळ्यांसमोर लाल रंगाचा रक्ताचा प्रवाह दिसत होता. पाण्याच्या त्या उबेमुळे मला मी आईच्या गर्भात असल्याचा भास झाला, जणू तिच्या पोटातूनच मी हे संपूर्ण जग पाहत होतो.



माझ्यातील उदासीनता दूर होऊन मोकळी हवा माझ्या शरीरात संचार करू लागली आणि माझ्यातील भावना तरंगू लागल्या. आयुष्याचा एकेक टप्पा पार करताना एक व्यक्ती आणि कलाकार म्हणून मला स्वतःला अधिक भक्कम करायचे आहे. टेकडी चढून वर गेल्यावर एक असा टप्पा आला, जिथे मोकळ्या हवेने मला वेढले. मी स्वतःशी पूर्णपणे एकरूप झालो. मोकळ्या आकाशात पाहताना ढग जमिनीवर चालत असल्याचा भास होत होता. ढगांच्या आडून येणारी सोन्यासारखी किरणे थक्क करत होती आणि निसर्गाचे बहुआयामी रूप दाखवत होती. हिरवा, पिवळा, निळा, जांभळा, पांढरा, केशरी, पोपटी, तपकिरी अशा विविध रंगांची उधळण मला तिथे दिसली. रंगभूमी देखील अशीच विविध रंगांनी बहरलेली आहे, याची अनुभूती मला आली.




त्या माळरानावर मोठी झाडे का नाहीत, हा प्रश्न जेव्हा पडला, तेव्हा मला दोन उत्तरे मिळाली—एक म्हणजे हवेचा तीव्र वेग आणि दुसरे म्हणजे मातीच्या थराखाली असलेला कठीण खडक. आयुष्यातही कधीकधी आपण अशा टप्प्यावर असतो, जिथे जीवन मर्यादित असते आणि आपण एकांतात असतो. पण त्या उंचीवरून जेव्हा आपण जमिनीकडे पाहतो, तेव्हा माणसांचे व्यवहार स्पष्ट दिसतात. ती उंची माणसाला स्वतःच्या गुंत्यातून बाहेर पडण्यासाठी प्रेरित करते. आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांकडे तटस्थपणे, बाहेरून पाहता यायला हवं , हा मोठा धडा मला निसर्गाने आणि रंगभूमीने दिला.



स्वतः जगलेले क्षण जेव्हा मी एकट्याने परफॉर्म केले, तेव्हा ते सहज करता आले. एका सहकलाकारासोबत परफॉर्म केले, तेव्हा ते क्षण अनुभवता आले, जगलेला अनुभव आणि दृष्टी मांडता आली. परंतु, जेव्हा ग्रुपसोबत परफॉर्म करण्याची वेळ आली, तेव्हा माझ्यासमोर जुनी, साचेबद्ध तालीम आडवी आली. मी जगलेला तो मुक्त प्रवास आणि मला मिळालेली दृष्टी ग्रुप परफॉर्मन्समध्ये मांडताना अडचण येत होती. प्रत्येकाचे इनपुट आणि सहभाग घेऊन दृश्य उभे करताना मला माझ्यातील कलात्मक दृष्टी कमी पडत असल्याची जाणीव झाली. संपूर्ण ग्रुपला अलाईन (Align) करून परफॉर्म करणे हे एक मोठे आव्हान वाटू लागले. पण हिंमत न हारता, टिकून राहणे महत्त्वाचे होते. नुसते उभे राहून उपयोग नव्हता, तर माझ्यातील चेतना मला जागृत ठेवायची होती. अखेर आठ तासांच्या अथक परिश्रमानंतर एक दृश्य तयार झाले, जे एक मोठी संकल्पना देऊन गेले—"जीवनचक्राच्या प्रवासात जे बाहेर पडते ते जीवन, आणि जे सतत फिरत राहते ते चक्र!"



या कार्यशाळेत येण्यापूर्वी मी माझ्या व्यक्तिगत कोषात अडकलो होतो. 'मी का करू?', 'कशासाठी करू?' हा अहंकाराचा डोंगर माझ्यात उभा होता. पण आज तो डोंगर वाहून गेला आहे. आता मला जाणवू लागले आहे की, मी रंगभूमीसाठी पूर्णपणे प्रवाही झालो आहे.

रंगकर्मी

तुषार म्हस्के

Sunday, 11 January 2026

मुंबईच्या प्रकृतीला निरोगी ठेवण्यासाठी मुंबईकरांच्या मेंदूत विचारांच झाड लावण्याचा संकल्प घेऊन आम्ही मुंबईकरांना भेटत आहोत... संवाद करत आहोत...- तुषार म्हस्के

 


#मुंबई 

आज मालाड ते दादर ट्रेन ने प्रवास करत असताना... ट्रेन चा येणारा आवाज... ट्रेन च्या आत मध्ये असणारी माणसे... त्यांच्या होणाऱ्या गप्पा... विस्तारलेले मुंबई शहर... प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करणारी मुंबई... पोटा - पाण्याच्या शोधात आलेले चाकरमानी, अस्तित्व निर्माण करण्यासाठी आलेले कलाकार... पैसे कमावण्यासाठी मुंबईत आलेली माणसे... मुंबई सगळ्यांना बघते... प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुंबई ही ती जागा प्रत्येक व्यक्तीला देते... जगाच्या कानाकोपऱ्यातून माणसे येतात... आणि आपली ओळख निर्माण करतात...? 

मुंबई  स्वप्न बघणाऱ्यांचे  स्वप्न पूर्ण करते... आणि आपण मुंबईला काय देतोय...  ? अशुद्ध हवा, कचऱ्याचे डोंगर, स्वतः च्या स्वार्थासाठी जंगलांची तोड, समुद्र किनारपट्टीवर मुंबईचे रक्षण करणारे झाडे ( mangroove ) तोडतो.. एकदा तरी विचार करतो का ? ज्या मुंबईने आमची स्वप्न पूर्ण केली आहेत त्या मुंबईला स्वतःच्या स्वार्थासाठी संपवत आहोत ? ज्या भूमिपुत्रांच्या जमिनीवर मुंबईकर राहत आहेत... त्यांना बेघर करतोय ? अशा अनेक प्रश्नांनी मनात एकच वादळ निर्माण केले... 

मंजुल भारद्वाज रचित नाटक द... अदर वर्ल्ड ची प्रस्तुती आम्ही 24 जानेवारी 2026, सकाळी 11.00 वाजता . श्री शिवाजी मंदिर, दादर येथे करणार आहोत... प्रेक्षक संवादाच्या माध्यमातून... मुंबईच्या प्रकृतीला निरोगी ठेवण्यासाठी मुंबईकरांच्या मेंदूत विचारांच झाड लावण्याचा संकल्प घेऊन आम्ही मुंबईकरांना भेटत आहोत... संवाद करत आहोत.... 

हम हैं !
रंगकर्मी तुषार म्हस्के


 

Thursday, 8 January 2026

मत देताना विचार करा....

 मत देताना विचार करा....

जल ... जंगल ... जमीन 

नैसर्गिक संसाधन यांना स्वार्था साठी वापरायचे आहेत... 

याचे परिणाम काय होतील त्याचा विचार करा... विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनांवर डल्ला मारणं सुरू आहे... गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्तेच्या केंद्र बिंदू मध्ये असणारे सत्ताधिश जनतेची दिशाभूल करत आहेत... जनतेला भावनिक गोष्टींचा खुराक देऊन सत्तेत यायचं आणि नैसर्गिक संसाधन आणि नैसर्गिक ठेवा ... भांडवल दाराच्या घशात टाकायचा... नक्की हे प्रकरण काय सुरू आहे... ? याचा भारतातील मालकांनी म्हणजेच जनतेने विचार करायला हवा... पण, अर्थात माणसाच्या भावना ह्या शून्य झाल्यात... स्वतःच मत, स्वतःची  भूमिका राहिली नाही... हा निसर्ग आणि पर्यावरण राहिला नाही तर आपण श्वास कसा घेणार ? 

आपला नाहीतर पुढच्या पिढी चा विचार करा... तुम्ही ज्यांना निवडून देता त्यांचा विचार नका करू ... त्यांच्या नावाने विदेशात घर आहेत... जागा आहे... त्यांची मुलं तिकडे शिफ्ट होतील... मात्र आमची मुलं श्वास घेण्यासाठी तरसतील... 

विचार करा ....! 


https://www.esakal.com/vidarbha/tadoba-tiger-reserve-wildlife-corridor-mining-project-approved-despite-opposition-maharashtra-government-spb94?fbclid=IwY2xjawPMt9pleHRuA2FlbQIxMABicmlkETFFUml6TEJGY2t4QnlqNU9Qc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHm_2Ufl4Ws-tspLkVL6WXzv8c4VoOdU_db0LMpRdQlQzTG_bJjkhzZxuVZ32_aem_VzjWPJEBtY8wOE9qwinPxg

तुषार म्हस्के 

प्रेक्षक संवादाच्या माध्यमातून आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी...

आज , दादर मध्ये 

मुंबई सर्वसामान्य माणसांची...आज दादर मध्ये चालत असताना आठवणी जाग्या झाल्या... श्री शिवाजी मंदिर,  मध्ये पाय ठेवल्यावर संपूर्ण 2015 पासूनचा इतिहास आठवला... मंजुल भारद्वाज रचित नाटक "  अनहद नाद - Unheard Sounds of Universe" या नाटकाने रंगभूमीची दिशा बदलली... तो प्रवास होता.. रंगभूमीला घडवण्याचा... रंगभूमीला  घडवण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे  प्रेक्षक... 

प्रेक्षक संवादाच्या माध्यमातून आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी... शोध घेत निघालो प्रेक्षकांचा... अगदी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलो... एक - एक व्यक्तीला भेटत संवाद करत आम्ही लोकांमध्ये नाटकाविषयी आदर, जबाबदारी, प्रेम, जाणीव निर्माण केली... त्या छोट्याशा रोपट्याचे आज वट वृक्षामध्ये रूपांतर झालेले आम्ही अनुभवत आहे... सर्व सामान्य माणूस नाटकाकडे पुन्हा वळत आहे... तो आवर्जून विचारतो...  " यावेळी, तुमचं कोणतं नाटक आहे... ! " आम्हाला पहायचं आहे... आम्ही नाटक पहायला येणार आहे... 

यावेळी, आम्ही मंजुल भारद्वाज रचित नाटक द... अदर वर्ल्ड ची  प्रस्तुती श्री शिवाजी मंदिर येथे करणार आहोत... येत्या 24 जानेवारी 2026, सकाळी 11.00 वाजता...

आम्ही आता मुंबई मध्ये प्रेक्षक संवादासाठी सज्ज आहोत... भेटुयात, बोलुयात, संवाद  साधूयात ... माणसाच्या आतील निसर्ग जागृत करुयात... माणसाच्या मेंदूत एक झाड लावुयात...

हम हैं !




रंगकर्मी
तुषार म्हस्के 

Saturday, 23 August 2025

पुरोगामी महाराष्ट्र ...

 पुरोगामी महाराष्ट्र ...


पुरोगामी महाराष्ट्र ...



मी इतिहासात वाचलेला, ऐकलेला महाराष्ट्र 

इथे भय नाही प्रश्न विचारण्याला, 

इथे भीती नाही सत्तेच्या खाली नतमस्तक होण्याची,

थोर संतांचा वारसा असणारा माहाराष्ट्र, 

इथे आजिबात वाव नाही खोटारडेपणाला, 

याच भूमीत जन्मले छत्रपती शिवाजी महाराज, 

छत्रपती संभाजी माहाराज, दिले स्वतंत्र त्यांनी आपल्याला, 

शिव, शाहू, फुले आंबेडकारांचा माहाराष्ट्र 

लेखणी घेतली सावित्रीने हातात आणि शिक्षणाचे द्वार उघडले मुली, महिलांसाठी

नजीकच्या काळात १०६ हुतात्त्म दिले, महाराष्ट्राच्या निर्माणासाठी ,

महाराष्ट्र समतेची भूमी निर्माण करणारा, माणसामाणसातील भेद संपवणारा,

निधड्या छातीने उभा असणारा महाराष्ट्र, देशाची आर्थिक राजधानी असणारा महाराष्ट्र... 

अभिमान वाटतो... या महाराष्ट्राचा .... 


पण, आता लेखणी एकाच बाजूने आपली स्टोरी लिहीत आहे.. 

पाठीचा कणा आता पत्रकारांचा ताठ नाही आहे... 

ती सत्तेची भाषा बोलत आहे ... कलाकार सत्तेकडून award घेण्यात व्यस्त आहेत... 

जणमाणसाबरोबर संवाद राहिलेला नाही... 

" खोटं बोला आणि ते रेटून बोला " वास्तवाला ते भ्रमित करून 

भ्रमाचे जाळे निर्माण करत आहेत... 

जनता लोकशाही मध्ये राजेशाही शोधत आहे... 

त्यांना आपल्या मताची किंमत हि फक्त पैशाने मोजत आहे... 

मग, सत्ताधारी हा धर्माच्या नावावर राजकारण करून, भांडवलदारांना देशाची संप्पती लुटत असो 

त्याचे  त्यांना काहीच फरक पडत नाही... 


आज सत्ताधार्यांना प्रश्न विचारण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही... 

शोकांतिका आहे शब्दासाठी जागणारे मावळे आज राहिलेले नाहीत... 

एकतर्फी जुलमी राज्य या महाराष्ट्रात निर्माण झाले आहे... 

आज फतवे निघत आहेत... मुलींनी घराच्या बाहेर पडू नये... 

जी मुलगी घरातल्या जाचाला कंटाळून बाहेर पडते तिच्या चरित्रावर हल्ले करून 

चार भिंतीत बंद केले जाते... रक्षक भक्षकांच्या भूमिकेत आले आहेत... 


कसा टिकणार हा पुरोगामी महाराष्ट्र ... कसं टिकवणार आपलं अस्तित्व ... 

हि मनाला लागलेली धास्ती आहे... 

इथे भूमिका माझी आहे...

माझी लेखणी अजून कमजोर झालेली नाही... 

माझ्या साहित्यातून मी मांडणी वास्तवाची करत आहे...

मी चित्रकार माझ्या चित्रांमधून शोषणाला विरोध करत आहे...

मी सृजनकार माझ्या कलेतून माणसाचं  अस्तित्व टिकवत आहे...


पुरोगामी महाराष्ट्राला ... माझ्या कलाकृतीतून जिवंत ठेवत आहे...


जय महाराष्ट्र .... पुरोगामी महाराष्ट्र ... 


@ तुषार म्हस्के

Thursday, 17 November 2022

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक : गोधडी संस्कृतीचा आत्मशोध ! थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत नाटक "गोधडी"

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक : गोधडी संस्कृतीचा आत्मशोध !

थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत नाटक "गोधडी"

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक : गोधडी संस्कृतीचा आत्मशोध !  थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत नाटक "गोधडी"


कुठे : श्री शिवाजी नाट्य मंदिर, #दादर 

कधी : 19 नोव्हेंबर 2022 , शनिवार रोजी, सकाळी 11.00 वाजता

कलाकार :

अश्विनी नांदेडकर,सायली पावसकर,कोमल खामकर, प्रियंका कांबळे, तुषार म्हस्के,संध्या बाविस्कर, तनिष्का लोंढे, प्रांजल गुडीले,आरोही बाविस्कर हे आहेत.

नाटक: गोधडी

 रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित “नाटक गोधडी संस्कृतीचा आत्मशोध आहे. संस्कृती, काळ, माती आणि निसर्गासोबत विविध समाजातील सण, प्रथा, चालीरीती, परंपरा यांचा शोध घेऊन मानवी विवेकाचा नवा धागा विणते.”

"गोधडी" भारताचा आत्मा आहे.भारताची विविधता हे नाटक स्पंदीत करते आणि आपल्यातील विवेकशीलतेला जागवते.या गोधडीत सामावले आहे आपले सारे जग. मनुष्याचे पाखंड आणि विकृतीला समूळ नष्ट करत मानवाच्या मूळ संस्कृतीचा शोध घेते. वर्चस्ववादी शोषणचक्राच्या मुळाशी जाऊन हिंसाचाराच्या विकृतीला आपल्या दृष्टीने अहिंसेची, मानवीय संवेदनांची आणि नैसर्गिकतेची संस्कृतीला उलगडण्याचा ध्यास आहे नाटक "गोधडी" .!

प्रत्येक मानवामध्ये दोन महत्त्वाचे पैलू आहेत, एक म्हणजे आत्मबळ आणि दुसरे आत्महीनता. आत्महीनतेमुळे जगातील वर्चस्व, मक्तेदारी, हुकूमशाही निर्माण होते ज्यामुळे जगातील मानवता नष्ट होते. आत्मबळातून विचार जन्माला येतात, ते जगातील विविधता, सर्वसमावेशकता, मानवता, न्याय आणि समतेला स्वीकारतात व निर्माण करतात.विचार आणि विकाराच्या संघर्षात जेव्हा विचार विकाराला मिटवतो व मानवी जाणिवेने जिवंत होतो, त्याच बोधाला 'कला' म्हणतात.

सत्ता व्यवस्था बनवू शकते परंतु माणसाला माणूस बनवू शकत नाही. मनुष्याला मनुष्य बनवते 'कला'. 'रंगकर्म' सर्व कलांना जन्म देते. रंगकर्मात सर्व कलांचा समावेश आहे.कारण रंगकर्म वैयक्तिक असूनही सर्वभौमिक आहे.मानवतेचे तत्व म्हणजे रंगकर्म !! तत्वाशिवाय माध्यम म्हणून ते अपूर्ण किंवा केवळ दिखावा आहे.

 रंगकर्म हे केवळ एक माध्यम नव्हे तर मानवतेची संपूर्ण दृष्टी आहे, दर्शन आहे.

मनुष्याच्या या अधोगतीचे कारण म्हणजे त्याच्या सांस्कृतिक चेतनेचा मृत्यू. इतिहास साक्षी आहे की,कोणी कितीही सामर्थ्यशाली, पारंगत, सर्वज्ञ माणूस, समाज, सभ्यता किंवा साम्राज्य असले तरीही जेव्हा त्यांची सांस्कृतिक चेतना भ्रमिष्ट झाली, तेव्हा त्यांचा विनाश झाला. सांस्कृतिक चेतना म्हणजे "जी चेतना माणसाला अंतर्गत आणि बाह्य वर्चस्वातून मुक्त करते, त्याच्या मूल्यांना उत्क्रांतीच्या मार्गावर उत्प्रेरित करते आणि प्रकृती माणसाचे स्वायत्त अस्तित्व घडवते" मात्र विज्ञानाला फासावर लटकवून त्यातून निघालेल्या एकाधिकारवादी तंत्रज्ञानाने प्रकृतीशी युद्धाची घोषणा केली आणि संपूर्ण मानव संस्कृती धुळीस मिळवण्यास सज्ज झाले आहे.आज जग युद्धात आहे आणि अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील, जेव्हा संपूर्ण राजनैतिक व्यवस्था विकली गेलेली आहे. सत्य-असत्याच्या पुढे जाऊन आणि निरंतर खोटे पसरवून समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या विकारांपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.

 थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत:

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य तत्व मागील 30 वर्षांपासून आपल्या नाट्य प्रस्तुतीतून निरंतर कलात्मक सृजन प्रक्रियांना उत्प्रेरीत करत आहे. सृजनशील विचारांच्या, कलासत्वाच्या, तात्विक प्रतिबद्धतेच्या आणि विवेकशील प्रतिरोधाच्या हुंकारने विश्वाला सुंदर आणि मानवीय बनवण्यासाठी समर्पित आहे.

मागील 30 वर्षांपासून ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या नाटय़ सिद्धांताने सतत कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली कलेप्रति जबाबदारी आणि कर्तव्ये निभावली आहेत. प्रेक्षक सहभागाच्या आधारावर मुंबईपासून मणिपूरपर्यंत हे ‘रंग आंदोलन’ सुरू आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ ने जीवनाला नाटकाशी जोडून आपल्या कलात्मक  नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ लढत आहे !

 

रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्याविषयी :

 

लेखक - दिग्दर्शक "थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार "थिएटर ऑफ रेलेवन्स" च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. गेल्या 30 वर्षांपासून, म्हणजे एक चतुर्थांश शतकाहून अधिक काळ, थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाटय सिद्धांताचे रंगकर्म करून जिवंत आहे. कोणतीही सत्ता, कॉर्पोरेट किंवा राजनैतिक पार्टीच्या आश्रयाविना भारतभर रंग आंदोलनाला उत्प्रेरित करत आहे. जगातील अनेक देशांमध्ये 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' नाटय सिद्धांतावर आधारित कार्यशाळांसोबत नाटकांची प्रस्तुती केली आहे.

….

Tuesday, 25 October 2022

5 नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिनानिमित्त थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक "गोधडी"

 5 नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिनानिमित्त

थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक "गोधडी"

कुठे : वासुदेव बळवंत फड़के नाट्यगृह, पनवेल

कधी : 5 नोव्हेंबर 2022 ,

शनिवार रोजी, सकाळी 11.30 वाजता

कलाकार : अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियांका कांबळे, तनिष्का, प्रांजल आणि अन्य कलाकार.

नाटक: गोधडी

रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित “नाटक गोधडी संस्कृतीचा आत्मशोध आहे. संस्कृती, काळ, माती आणि निसर्गासोबत विविध समाजातील सण, प्रथा, चालीरीती, परंपरा यांचा शोध घेऊन मानवी विवेकाचा नवा धागा विणते.”

"गोधडी" भारताचा आत्मा आहे.भारताची विविधता हे नाटक स्पंदीत करते आणि आपल्यातील विवेकशीलतेला जागवते.या गोधडीत सामावले आहे आपले सारे जग. मनुष्याचे पाखंड आणि विकृतीला समूळ नष्ट करत मानवाच्या मूळ संस्कृतीचा शोध घेते. वर्चस्ववादी शोषणचक्राच्या मुळाशी जाऊन हिंसाचाराच्या विकृतीला आपल्या दृष्टीने अहिंसेची, मानवीय संवेदनांची आणि नैसर्गिकतेची संस्कृतीला उलगडण्याचा ध्यास आहे नाटक "गोधडी" .!

प्रत्येक मानवामध्ये दोन महत्त्वाचे पैलू आहेत, एक म्हणजे आत्मबळ आणि दुसरे आत्महीनता. आत्महीनतेमुळे जगातील वर्चस्व, मक्तेदारी, हुकूमशाही निर्माण होते ज्यामुळे जगातील मानवता नष्ट होते. आत्मबळातून विचार जन्माला येतात, ते जगातील विविधता, सर्वसमावेशकता, मानवता, न्याय आणि समतेला स्वीकारतात व निर्माण करतात.विचार आणि विकाराच्या संघर्षात जेव्हा विचार विकाराला मिटवतो व मानवी जाणिवेने जिवंत होतो, त्याच बोधाला 'कला' म्हणतात.

सत्ता व्यवस्था बनवू शकते परंतु माणसाला माणूस बनवू शकत नाही. मनुष्याला मनुष्य बनवते 'कला'. 'रंगकर्म' सर्व कलांना जन्म देते. रंगकर्मात सर्व कलांचा समावेश आहे.कारण रंगकर्म वैयक्तिक असूनही सर्वभौमिक आहे.मानवतेचे तत्व म्हणजे रंगकर्म !! तत्वाशिवाय माध्यम म्हणून ते अपूर्ण किंवा केवळ दिखावा आहे.

रंगकर्म हे केवळ एक माध्यम नव्हे तर मानवतेची संपूर्ण दृष्टी आहे, दर्शन आहे.मनुष्याच्या या अधोगतीचे कारण म्हणजे त्याच्या सांस्कृतिक चेतनेचा मृत्यू. इतिहास साक्षी आहे की,कोणी कितीही सामर्थ्यशाली, पारंगत, सर्वज्ञ माणूस, समाज, सभ्यता किंवा साम्राज्य असले तरीही जेव्हा त्यांची सांस्कृतिक चेतना भ्रमिष्ट झाली, तेव्हा त्यांचा विनाश झाला. सांस्कृतिक चेतना म्हणजे "जी चेतना माणसाला अंतर्गत आणि बाह्य वर्चस्वातून मुक्त करते, त्याच्या मूल्यांना उत्क्रांतीच्या मार्गावर उत्प्रेरित करते आणि प्रकृती माणसाचे स्वायत्त अस्तित्व घडवते" मात्र विज्ञानाला फासावर लटकवून त्यातून निघालेल्या एकाधिकारवादी तंत्रज्ञानाने प्रकृतीशी युद्धाची घोषणा केली आणि संपूर्ण मानव संस्कृती धुळीस मिळवण्यास सज्ज झाले आहे.आज जग युद्धात आहे आणि अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील, जेव्हा संपूर्ण राजनैतिक व्यवस्था विकली गेलेली आहे. सत्य-असत्याच्या पुढे जाऊन आणि निरंतर खोटे पसरवून समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या विकारांपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.


थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य तत्व मागील 30 वर्षांपासून आपल्या नाट्य प्रस्तुतीतून निरंतर कलात्मक सृजन प्रक्रियांना उत्प्रेरीत करत आहे. सृजनशील विचारांच्या, कलासत्वाच्या, तात्विक प्रतिबद्धतेच्या आणि विवेकशील प्रतिरोधाच्या हुंकारने विश्वाला सुंदर आणि मानवीय बनवण्यासाठी समर्पित आहे.

मागील 30 वर्षांपासून ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या नाटय़ सिद्धांताने सतत कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली कलेप्रति जबाबदारी आणि कर्तव्ये निभावली आहेत. प्रेक्षक सहभागाच्या आधारावर मुंबईपासून मणिपूरपर्यंत हे ‘रंग आंदोलन’ सुरू आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ ने जीवनाला नाटकाशी जोडून आपल्या कलात्मक नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ लढत आहे !

रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्याविषयी :

लेखक - दिग्दर्शक "थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार "थिएटर ऑफ रेलेवन्स" च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. गेल्या 30 वर्षांपासून, म्हणजे एक चतुर्थांश शतकाहून अधिक काळ, थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाटय सिद्धांताचे रंगकर्म करून जिवंत आहे. कोणतीही सत्ता, कॉर्पोरेट किंवा राजनैतिक पार्टीच्या आश्रयाविना भारतभर रंग आंदोलनाला उत्प्रेरित करत आहे. जगातील अनेक देशांमध्ये 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' नाटय सिद्धांतावर आधारित कार्यशाळांसोबत नाटकांची प्रस्तुती केली आहे.