Sunday, 11 January 2026

मुंबईच्या प्रकृतीला निरोगी ठेवण्यासाठी मुंबईकरांच्या मेंदूत विचारांच झाड लावण्याचा संकल्प घेऊन आम्ही मुंबईकरांना भेटत आहोत... संवाद करत आहोत...- तुषार म्हस्के

 


#मुंबई 

आज मालाड ते दादर ट्रेन ने प्रवास करत असताना... ट्रेन चा येणारा आवाज... ट्रेन च्या आत मध्ये असणारी माणसे... त्यांच्या होणाऱ्या गप्पा... विस्तारलेले मुंबई शहर... प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करणारी मुंबई... पोटा - पाण्याच्या शोधात आलेले चाकरमानी, अस्तित्व निर्माण करण्यासाठी आलेले कलाकार... पैसे कमावण्यासाठी मुंबईत आलेली माणसे... मुंबई सगळ्यांना बघते... प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुंबई ही ती जागा प्रत्येक व्यक्तीला देते... जगाच्या कानाकोपऱ्यातून माणसे येतात... आणि आपली ओळख निर्माण करतात...? 

मुंबई  स्वप्न बघणाऱ्यांचे  स्वप्न पूर्ण करते... आणि आपण मुंबईला काय देतोय...  ? अशुद्ध हवा, कचऱ्याचे डोंगर, स्वतः च्या स्वार्थासाठी जंगलांची तोड, समुद्र किनारपट्टीवर मुंबईचे रक्षण करणारे झाडे ( mangroove ) तोडतो.. एकदा तरी विचार करतो का ? ज्या मुंबईने आमची स्वप्न पूर्ण केली आहेत त्या मुंबईला स्वतःच्या स्वार्थासाठी संपवत आहोत ? ज्या भूमिपुत्रांच्या जमिनीवर मुंबईकर राहत आहेत... त्यांना बेघर करतोय ? अशा अनेक प्रश्नांनी मनात एकच वादळ निर्माण केले... 

मंजुल भारद्वाज रचित नाटक द... अदर वर्ल्ड ची प्रस्तुती आम्ही 24 जानेवारी 2026, सकाळी 11.00 वाजता . श्री शिवाजी मंदिर, दादर येथे करणार आहोत... प्रेक्षक संवादाच्या माध्यमातून... मुंबईच्या प्रकृतीला निरोगी ठेवण्यासाठी मुंबईकरांच्या मेंदूत विचारांच झाड लावण्याचा संकल्प घेऊन आम्ही मुंबईकरांना भेटत आहोत... संवाद करत आहोत.... 

हम हैं !
रंगकर्मी तुषार म्हस्के


 

Thursday, 8 January 2026

मत देताना विचार करा....

 मत देताना विचार करा....

जल ... जंगल ... जमीन 

नैसर्गिक संसाधन यांना स्वार्था साठी वापरायचे आहेत... 

याचे परिणाम काय होतील त्याचा विचार करा... विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनांवर डल्ला मारणं सुरू आहे... गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्तेच्या केंद्र बिंदू मध्ये असणारे सत्ताधिश जनतेची दिशाभूल करत आहेत... जनतेला भावनिक गोष्टींचा खुराक देऊन सत्तेत यायचं आणि नैसर्गिक संसाधन आणि नैसर्गिक ठेवा ... भांडवल दाराच्या घशात टाकायचा... नक्की हे प्रकरण काय सुरू आहे... ? याचा भारतातील मालकांनी म्हणजेच जनतेने विचार करायला हवा... पण, अर्थात माणसाच्या भावना ह्या शून्य झाल्यात... स्वतःच मत, स्वतःची  भूमिका राहिली नाही... हा निसर्ग आणि पर्यावरण राहिला नाही तर आपण श्वास कसा घेणार ? 

आपला नाहीतर पुढच्या पिढी चा विचार करा... तुम्ही ज्यांना निवडून देता त्यांचा विचार नका करू ... त्यांच्या नावाने विदेशात घर आहेत... जागा आहे... त्यांची मुलं तिकडे शिफ्ट होतील... मात्र आमची मुलं श्वास घेण्यासाठी तरसतील... 

विचार करा ....! 


https://www.esakal.com/vidarbha/tadoba-tiger-reserve-wildlife-corridor-mining-project-approved-despite-opposition-maharashtra-government-spb94?fbclid=IwY2xjawPMt9pleHRuA2FlbQIxMABicmlkETFFUml6TEJGY2t4QnlqNU9Qc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHm_2Ufl4Ws-tspLkVL6WXzv8c4VoOdU_db0LMpRdQlQzTG_bJjkhzZxuVZ32_aem_VzjWPJEBtY8wOE9qwinPxg

तुषार म्हस्के 

प्रेक्षक संवादाच्या माध्यमातून आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी...

आज , दादर मध्ये 

मुंबई सर्वसामान्य माणसांची...आज दादर मध्ये चालत असताना आठवणी जाग्या झाल्या... श्री शिवाजी मंदिर,  मध्ये पाय ठेवल्यावर संपूर्ण 2015 पासूनचा इतिहास आठवला... मंजुल भारद्वाज रचित नाटक "  अनहद नाद - Unheard Sounds of Universe" या नाटकाने रंगभूमीची दिशा बदलली... तो प्रवास होता.. रंगभूमीला घडवण्याचा... रंगभूमीला  घडवण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे  प्रेक्षक... 

प्रेक्षक संवादाच्या माध्यमातून आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी... शोध घेत निघालो प्रेक्षकांचा... अगदी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलो... एक - एक व्यक्तीला भेटत संवाद करत आम्ही लोकांमध्ये नाटकाविषयी आदर, जबाबदारी, प्रेम, जाणीव निर्माण केली... त्या छोट्याशा रोपट्याचे आज वट वृक्षामध्ये रूपांतर झालेले आम्ही अनुभवत आहे... सर्व सामान्य माणूस नाटकाकडे पुन्हा वळत आहे... तो आवर्जून विचारतो...  " यावेळी, तुमचं कोणतं नाटक आहे... ! " आम्हाला पहायचं आहे... आम्ही नाटक पहायला येणार आहे... 

यावेळी, आम्ही मंजुल भारद्वाज रचित नाटक द... अदर वर्ल्ड ची  प्रस्तुती श्री शिवाजी मंदिर येथे करणार आहोत... येत्या 24 जानेवारी 2026, सकाळी 11.00 वाजता...

आम्ही आता मुंबई मध्ये प्रेक्षक संवादासाठी सज्ज आहोत... भेटुयात, बोलुयात, संवाद  साधूयात ... माणसाच्या आतील निसर्ग जागृत करुयात... माणसाच्या मेंदूत एक झाड लावुयात...

हम हैं !




रंगकर्मी
तुषार म्हस्के 

Saturday, 23 August 2025

पुरोगामी महाराष्ट्र ...

 पुरोगामी महाराष्ट्र ...


पुरोगामी महाराष्ट्र ...



मी इतिहासात वाचलेला, ऐकलेला महाराष्ट्र 

इथे भय नाही प्रश्न विचारण्याला, 

इथे भीती नाही सत्तेच्या खाली नतमस्तक होण्याची,

थोर संतांचा वारसा असणारा माहाराष्ट्र, 

इथे आजिबात वाव नाही खोटारडेपणाला, 

याच भूमीत जन्मले छत्रपती शिवाजी महाराज, 

छत्रपती संभाजी माहाराज, दिले स्वतंत्र त्यांनी आपल्याला, 

शिव, शाहू, फुले आंबेडकारांचा माहाराष्ट्र 

लेखणी घेतली सावित्रीने हातात आणि शिक्षणाचे द्वार उघडले मुली, महिलांसाठी

नजीकच्या काळात १०६ हुतात्त्म दिले, महाराष्ट्राच्या निर्माणासाठी ,

महाराष्ट्र समतेची भूमी निर्माण करणारा, माणसामाणसातील भेद संपवणारा,

निधड्या छातीने उभा असणारा महाराष्ट्र, देशाची आर्थिक राजधानी असणारा महाराष्ट्र... 

अभिमान वाटतो... या महाराष्ट्राचा .... 


पण, आता लेखणी एकाच बाजूने आपली स्टोरी लिहीत आहे.. 

पाठीचा कणा आता पत्रकारांचा ताठ नाही आहे... 

ती सत्तेची भाषा बोलत आहे ... कलाकार सत्तेकडून award घेण्यात व्यस्त आहेत... 

जणमाणसाबरोबर संवाद राहिलेला नाही... 

" खोटं बोला आणि ते रेटून बोला " वास्तवाला ते भ्रमित करून 

भ्रमाचे जाळे निर्माण करत आहेत... 

जनता लोकशाही मध्ये राजेशाही शोधत आहे... 

त्यांना आपल्या मताची किंमत हि फक्त पैशाने मोजत आहे... 

मग, सत्ताधारी हा धर्माच्या नावावर राजकारण करून, भांडवलदारांना देशाची संप्पती लुटत असो 

त्याचे  त्यांना काहीच फरक पडत नाही... 


आज सत्ताधार्यांना प्रश्न विचारण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही... 

शोकांतिका आहे शब्दासाठी जागणारे मावळे आज राहिलेले नाहीत... 

एकतर्फी जुलमी राज्य या महाराष्ट्रात निर्माण झाले आहे... 

आज फतवे निघत आहेत... मुलींनी घराच्या बाहेर पडू नये... 

जी मुलगी घरातल्या जाचाला कंटाळून बाहेर पडते तिच्या चरित्रावर हल्ले करून 

चार भिंतीत बंद केले जाते... रक्षक भक्षकांच्या भूमिकेत आले आहेत... 


कसा टिकणार हा पुरोगामी महाराष्ट्र ... कसं टिकवणार आपलं अस्तित्व ... 

हि मनाला लागलेली धास्ती आहे... 

इथे भूमिका माझी आहे...

माझी लेखणी अजून कमजोर झालेली नाही... 

माझ्या साहित्यातून मी मांडणी वास्तवाची करत आहे...

मी चित्रकार माझ्या चित्रांमधून शोषणाला विरोध करत आहे...

मी सृजनकार माझ्या कलेतून माणसाचं  अस्तित्व टिकवत आहे...


पुरोगामी महाराष्ट्राला ... माझ्या कलाकृतीतून जिवंत ठेवत आहे...


जय महाराष्ट्र .... पुरोगामी महाराष्ट्र ... 


@ तुषार म्हस्के

Thursday, 17 November 2022

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक : गोधडी संस्कृतीचा आत्मशोध ! थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत नाटक "गोधडी"

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक : गोधडी संस्कृतीचा आत्मशोध !

थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत नाटक "गोधडी"

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक : गोधडी संस्कृतीचा आत्मशोध !  थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत नाटक "गोधडी"


कुठे : श्री शिवाजी नाट्य मंदिर, #दादर 

कधी : 19 नोव्हेंबर 2022 , शनिवार रोजी, सकाळी 11.00 वाजता

कलाकार :

अश्विनी नांदेडकर,सायली पावसकर,कोमल खामकर, प्रियंका कांबळे, तुषार म्हस्के,संध्या बाविस्कर, तनिष्का लोंढे, प्रांजल गुडीले,आरोही बाविस्कर हे आहेत.

नाटक: गोधडी

 रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित “नाटक गोधडी संस्कृतीचा आत्मशोध आहे. संस्कृती, काळ, माती आणि निसर्गासोबत विविध समाजातील सण, प्रथा, चालीरीती, परंपरा यांचा शोध घेऊन मानवी विवेकाचा नवा धागा विणते.”

"गोधडी" भारताचा आत्मा आहे.भारताची विविधता हे नाटक स्पंदीत करते आणि आपल्यातील विवेकशीलतेला जागवते.या गोधडीत सामावले आहे आपले सारे जग. मनुष्याचे पाखंड आणि विकृतीला समूळ नष्ट करत मानवाच्या मूळ संस्कृतीचा शोध घेते. वर्चस्ववादी शोषणचक्राच्या मुळाशी जाऊन हिंसाचाराच्या विकृतीला आपल्या दृष्टीने अहिंसेची, मानवीय संवेदनांची आणि नैसर्गिकतेची संस्कृतीला उलगडण्याचा ध्यास आहे नाटक "गोधडी" .!

प्रत्येक मानवामध्ये दोन महत्त्वाचे पैलू आहेत, एक म्हणजे आत्मबळ आणि दुसरे आत्महीनता. आत्महीनतेमुळे जगातील वर्चस्व, मक्तेदारी, हुकूमशाही निर्माण होते ज्यामुळे जगातील मानवता नष्ट होते. आत्मबळातून विचार जन्माला येतात, ते जगातील विविधता, सर्वसमावेशकता, मानवता, न्याय आणि समतेला स्वीकारतात व निर्माण करतात.विचार आणि विकाराच्या संघर्षात जेव्हा विचार विकाराला मिटवतो व मानवी जाणिवेने जिवंत होतो, त्याच बोधाला 'कला' म्हणतात.

सत्ता व्यवस्था बनवू शकते परंतु माणसाला माणूस बनवू शकत नाही. मनुष्याला मनुष्य बनवते 'कला'. 'रंगकर्म' सर्व कलांना जन्म देते. रंगकर्मात सर्व कलांचा समावेश आहे.कारण रंगकर्म वैयक्तिक असूनही सर्वभौमिक आहे.मानवतेचे तत्व म्हणजे रंगकर्म !! तत्वाशिवाय माध्यम म्हणून ते अपूर्ण किंवा केवळ दिखावा आहे.

 रंगकर्म हे केवळ एक माध्यम नव्हे तर मानवतेची संपूर्ण दृष्टी आहे, दर्शन आहे.

मनुष्याच्या या अधोगतीचे कारण म्हणजे त्याच्या सांस्कृतिक चेतनेचा मृत्यू. इतिहास साक्षी आहे की,कोणी कितीही सामर्थ्यशाली, पारंगत, सर्वज्ञ माणूस, समाज, सभ्यता किंवा साम्राज्य असले तरीही जेव्हा त्यांची सांस्कृतिक चेतना भ्रमिष्ट झाली, तेव्हा त्यांचा विनाश झाला. सांस्कृतिक चेतना म्हणजे "जी चेतना माणसाला अंतर्गत आणि बाह्य वर्चस्वातून मुक्त करते, त्याच्या मूल्यांना उत्क्रांतीच्या मार्गावर उत्प्रेरित करते आणि प्रकृती माणसाचे स्वायत्त अस्तित्व घडवते" मात्र विज्ञानाला फासावर लटकवून त्यातून निघालेल्या एकाधिकारवादी तंत्रज्ञानाने प्रकृतीशी युद्धाची घोषणा केली आणि संपूर्ण मानव संस्कृती धुळीस मिळवण्यास सज्ज झाले आहे.आज जग युद्धात आहे आणि अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील, जेव्हा संपूर्ण राजनैतिक व्यवस्था विकली गेलेली आहे. सत्य-असत्याच्या पुढे जाऊन आणि निरंतर खोटे पसरवून समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या विकारांपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.

 थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत:

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य तत्व मागील 30 वर्षांपासून आपल्या नाट्य प्रस्तुतीतून निरंतर कलात्मक सृजन प्रक्रियांना उत्प्रेरीत करत आहे. सृजनशील विचारांच्या, कलासत्वाच्या, तात्विक प्रतिबद्धतेच्या आणि विवेकशील प्रतिरोधाच्या हुंकारने विश्वाला सुंदर आणि मानवीय बनवण्यासाठी समर्पित आहे.

मागील 30 वर्षांपासून ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या नाटय़ सिद्धांताने सतत कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली कलेप्रति जबाबदारी आणि कर्तव्ये निभावली आहेत. प्रेक्षक सहभागाच्या आधारावर मुंबईपासून मणिपूरपर्यंत हे ‘रंग आंदोलन’ सुरू आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ ने जीवनाला नाटकाशी जोडून आपल्या कलात्मक  नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ लढत आहे !

 

रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्याविषयी :

 

लेखक - दिग्दर्शक "थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार "थिएटर ऑफ रेलेवन्स" च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. गेल्या 30 वर्षांपासून, म्हणजे एक चतुर्थांश शतकाहून अधिक काळ, थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाटय सिद्धांताचे रंगकर्म करून जिवंत आहे. कोणतीही सत्ता, कॉर्पोरेट किंवा राजनैतिक पार्टीच्या आश्रयाविना भारतभर रंग आंदोलनाला उत्प्रेरित करत आहे. जगातील अनेक देशांमध्ये 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' नाटय सिद्धांतावर आधारित कार्यशाळांसोबत नाटकांची प्रस्तुती केली आहे.

….

Tuesday, 25 October 2022

5 नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिनानिमित्त थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक "गोधडी"

 5 नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिनानिमित्त

थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक "गोधडी"

कुठे : वासुदेव बळवंत फड़के नाट्यगृह, पनवेल

कधी : 5 नोव्हेंबर 2022 ,

शनिवार रोजी, सकाळी 11.30 वाजता

कलाकार : अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियांका कांबळे, तनिष्का, प्रांजल आणि अन्य कलाकार.

नाटक: गोधडी

रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित “नाटक गोधडी संस्कृतीचा आत्मशोध आहे. संस्कृती, काळ, माती आणि निसर्गासोबत विविध समाजातील सण, प्रथा, चालीरीती, परंपरा यांचा शोध घेऊन मानवी विवेकाचा नवा धागा विणते.”

"गोधडी" भारताचा आत्मा आहे.भारताची विविधता हे नाटक स्पंदीत करते आणि आपल्यातील विवेकशीलतेला जागवते.या गोधडीत सामावले आहे आपले सारे जग. मनुष्याचे पाखंड आणि विकृतीला समूळ नष्ट करत मानवाच्या मूळ संस्कृतीचा शोध घेते. वर्चस्ववादी शोषणचक्राच्या मुळाशी जाऊन हिंसाचाराच्या विकृतीला आपल्या दृष्टीने अहिंसेची, मानवीय संवेदनांची आणि नैसर्गिकतेची संस्कृतीला उलगडण्याचा ध्यास आहे नाटक "गोधडी" .!

प्रत्येक मानवामध्ये दोन महत्त्वाचे पैलू आहेत, एक म्हणजे आत्मबळ आणि दुसरे आत्महीनता. आत्महीनतेमुळे जगातील वर्चस्व, मक्तेदारी, हुकूमशाही निर्माण होते ज्यामुळे जगातील मानवता नष्ट होते. आत्मबळातून विचार जन्माला येतात, ते जगातील विविधता, सर्वसमावेशकता, मानवता, न्याय आणि समतेला स्वीकारतात व निर्माण करतात.विचार आणि विकाराच्या संघर्षात जेव्हा विचार विकाराला मिटवतो व मानवी जाणिवेने जिवंत होतो, त्याच बोधाला 'कला' म्हणतात.

सत्ता व्यवस्था बनवू शकते परंतु माणसाला माणूस बनवू शकत नाही. मनुष्याला मनुष्य बनवते 'कला'. 'रंगकर्म' सर्व कलांना जन्म देते. रंगकर्मात सर्व कलांचा समावेश आहे.कारण रंगकर्म वैयक्तिक असूनही सर्वभौमिक आहे.मानवतेचे तत्व म्हणजे रंगकर्म !! तत्वाशिवाय माध्यम म्हणून ते अपूर्ण किंवा केवळ दिखावा आहे.

रंगकर्म हे केवळ एक माध्यम नव्हे तर मानवतेची संपूर्ण दृष्टी आहे, दर्शन आहे.मनुष्याच्या या अधोगतीचे कारण म्हणजे त्याच्या सांस्कृतिक चेतनेचा मृत्यू. इतिहास साक्षी आहे की,कोणी कितीही सामर्थ्यशाली, पारंगत, सर्वज्ञ माणूस, समाज, सभ्यता किंवा साम्राज्य असले तरीही जेव्हा त्यांची सांस्कृतिक चेतना भ्रमिष्ट झाली, तेव्हा त्यांचा विनाश झाला. सांस्कृतिक चेतना म्हणजे "जी चेतना माणसाला अंतर्गत आणि बाह्य वर्चस्वातून मुक्त करते, त्याच्या मूल्यांना उत्क्रांतीच्या मार्गावर उत्प्रेरित करते आणि प्रकृती माणसाचे स्वायत्त अस्तित्व घडवते" मात्र विज्ञानाला फासावर लटकवून त्यातून निघालेल्या एकाधिकारवादी तंत्रज्ञानाने प्रकृतीशी युद्धाची घोषणा केली आणि संपूर्ण मानव संस्कृती धुळीस मिळवण्यास सज्ज झाले आहे.आज जग युद्धात आहे आणि अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील, जेव्हा संपूर्ण राजनैतिक व्यवस्था विकली गेलेली आहे. सत्य-असत्याच्या पुढे जाऊन आणि निरंतर खोटे पसरवून समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या विकारांपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.


थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य तत्व मागील 30 वर्षांपासून आपल्या नाट्य प्रस्तुतीतून निरंतर कलात्मक सृजन प्रक्रियांना उत्प्रेरीत करत आहे. सृजनशील विचारांच्या, कलासत्वाच्या, तात्विक प्रतिबद्धतेच्या आणि विवेकशील प्रतिरोधाच्या हुंकारने विश्वाला सुंदर आणि मानवीय बनवण्यासाठी समर्पित आहे.

मागील 30 वर्षांपासून ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या नाटय़ सिद्धांताने सतत कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली कलेप्रति जबाबदारी आणि कर्तव्ये निभावली आहेत. प्रेक्षक सहभागाच्या आधारावर मुंबईपासून मणिपूरपर्यंत हे ‘रंग आंदोलन’ सुरू आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ ने जीवनाला नाटकाशी जोडून आपल्या कलात्मक नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ लढत आहे !

रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्याविषयी :

लेखक - दिग्दर्शक "थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार "थिएटर ऑफ रेलेवन्स" च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. गेल्या 30 वर्षांपासून, म्हणजे एक चतुर्थांश शतकाहून अधिक काळ, थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाटय सिद्धांताचे रंगकर्म करून जिवंत आहे. कोणतीही सत्ता, कॉर्पोरेट किंवा राजनैतिक पार्टीच्या आश्रयाविना भारतभर रंग आंदोलनाला उत्प्रेरित करत आहे. जगातील अनेक देशांमध्ये 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' नाटय सिद्धांतावर आधारित कार्यशाळांसोबत नाटकांची प्रस्तुती केली आहे.



Wednesday, 18 May 2022

नाटकासाठी परिवाराचा मिळणारा सपोर्ट माझ्यासाठी प्रेरणा देणारा आहे...तुषार म्हस्के



रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक लोक-शास्त्र सावित्री
माझ्यासाठी प्रेरणा आहे. घर- परिवारामध्ये एक  नवीन ओळख निर्माण करत आहे. नाटक सादरीकरण प्रस्तुति एक भाग आहे. त्यापलीकडे नाटकाच्या प्रयोगासाठी परिवाराचा पुढाकार हा तेवढाच महत्वाचा आहे. " थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताची " ही प्रक्रिया घर परिवाराला एकत्र जोडणारी आहे. त्यामुळे, नाती केवळ भावनिक राहत नाही तर नात्यामध्ये एक वैचारिक स्पष्टता निर्माण होते. नाटक केवळ मनोरंजनासाठी राहत नाही . नाटक हे जीवनाला दृष्टी देणारे होऊन जाते. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील दरी संपते आणि प्रेक्षक हे नाटकासाठी आपली भूमिका बजावू लागतात.

 लोक- शास्त्र सावित्री नाटकाचा प्रयोग हा पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिर ला 29 एप्रिल 2022 रोजी , सायंकाळी 5:30 वाजता प्रस्तुत झाला . नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी, नाटक पुणे येथे प्रस्तुत होणार होत... थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताची मूळ प्रक्रिया आहे प्रेक्षक संवाद ... 14 ते 18 एप्रिल 2022 ला  थिएटर ऑफ रेलेवन्स ची कार्यशाळा सुरू होणार होती. त्या नियोजनामध्ये संवाद करत असताना 29 तारखेला प्रयोग सुनिश्चित झाला. 



सकाळी 7 ते दुपारी 1 मध्ये निळू फुले कला अकादमी मध्ये कार्यशाळा असायची त्यानंतर आम्ही प्रेक्षक संवाद करायचो. परिवार आणि कुटुंबासाठी स्वाती चा एक पुढाकार मला आणि टीम ला खूप आवडला..  तिने नाटक संपूर्ण फॅमिली ला म्हणजेच, तिच्या मामाकडच्या परिवाराला दाखवण्याचे ठरवले. हा पुढाकार म्हणजे मोठं पाऊल होतं... परिवाराला वैचारिक पातळीवर एकत्र जोडण्याचं... याच पुढाकाराला प्रतिसाद म्हणून स्वाती च्या मामी ने घेतलेला पुढाकार हा तेवढाच महत्वाचा होता. थिएटर ऑफ रेलेवन्स च्या संपूर्ण टीम ला घरी येऊन जेवणाचं दिलेलं निमंत्रण माझ्या साठी खूप महत्वाचे होते... यावेळी, प्रेक्षक संवाद प्रक्रियेला सुरुवात माझ्याकडून झाली याचं एक वेगळचं समाधान मला जाणवत होते... माझ्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी फोन करून त्यांना भेटण्याचे नियोजन करत होतो... 

पुण्यात असणारी ओळखीची माणसे मला त्याबद्दल चांगलाच रिस्पॉन्स देत होते... यामध्ये , मला एक क्षण जो मी माझ्या हृदयात कोरुन ठेवला आहे तो म्हणजे, माझी टीम लीडर अश्विनी ताई बोललेली यावेळी, पुण्यामध्ये प्रेक्षक संवादाची सुरुवात तुषार ने केली... खूप छान आणि प्रेरणादायी वाटले... चंद्राचा पडलेला प्रकाश आणि पुण्यामध्ये सरकारी गेस्ट हाऊसच्या गच्चीवर आम्ही टीम म्हणून  संपूर्ण दिवसाची शेअरिंग करत असताना असलेला हा क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता..त्यावेळची  मिळालेली ऊर्जा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली...


प्रेक्षक संवाद करत असताना नव - नवीन संकल्पना घेऊन पुण्यात उतरलो होतो. स्वातीच्या मामी चा पहिला पुढाकार सर्व टीम ला जेवायला बोलावणं... त्याच बरोबर त्यावेळच्या पुढाकाराला मंजुल सरांनी दिलेली दृष्टी मामी मध्ये असणारे नेतृत्व गुण आणि सर्वांना एकत्र आणणारा स्वभाव... महत्वाचा होता...नाटकाच्या प्रकियेसाठी आम्ही पुण्यातील प्रत्येक व्यक्तीला भेटत होतो... संवाद करत होतो..मला जाणवत होते... आपल्याला पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतीबा फुले यांच्या विचारांना पुण्यामध्ये पुन्हा जागृत करायचं आहे... त्यानुसार, प्रत्येक व्यक्तीला त्या विचारांबरोबर जोडत होतो... 

स्वातीचे आजोबा साधारणतः 75 ते 80 वय असेल परंतु, नवीन विचारांना समजून घेणारे आणि प्रक्रियेला पुढे घेऊन जाणारे जाणवले... संकल्पना सांगितल्या नंतर त्या संकल्पनेला कसं करता येईल त्यासाठी , त्यांची होत असणारी धावपळ त्यासाठी , एवढं वय असतानाही त्यांचा असणारा पुढाकार खूप मोलाचा आहे माझ्यासाठी..प्रेक्षक संवाद करायला जात असताना कोणाला कधी , केव्हा भेटायचं यांविषयी असणारा त्यांचा अनुभव हा जबरदस्त जाणवला... 

पुण्यामध्ये संवाद करत असताना येत असणारा अनुभव हा खूप मोलाचा होता... नाटकाची संकल्पना आणि थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताची प्रक्रिया एका नगरसेवकांना सांगितल्या नंतर प्रेक्षक म्हणून त्यांनी त्यांच्या विभागात नाटकाचे बॅनर लावले ... आणि त्यांचं वाक्य " तुम्ही हे करत आहात ते कार्य आम्हांला करायला हवं ते तुमच्या कडून होतंय त्याबद्दल आमच्याकडून ह्या सदिच्छा ! प्रत्येक माणसापर्यंत कशा पद्धतीने पोहचता येईल...? आणि नाटक कसं पोहोचेल यासाठी प्रेक्षक स्वतः हुन पुढाकार घेत असताना दिसू लागले होते... स्वातीचे आजोबा हे त्यांच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नाटकाविषयी सांगत होते... " आमचे नात जावई ह्या नाटकात आहेत , आणि बरं का ते सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंच्या विचाराला घेऊन नाटक करत आहेत, अशा विचारांसाठी कमी लोक काम करतात .." आपल्याला ह्या कार्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे...ही भूमिका मनाला खूप भावणारी होती...

कोरोना काळानंतर  दुसरा फेज  संपल्यानंतर एक उदासीनता निर्माण झालेली होती... माणसा - माणसांमध्ये असणारे माणुसकीचे धागे हे कमकुवत झालेले..नैराश्य निर्माण झालेलं .... अशा वातावरणात नाटक लोक- शास्त्र सावित्रीचा प्रयोग पुण्यामध्ये होणारा हा प्रयोग म्हणजे पुणेकरांसाठी  जीवन जगण्यासाठी असणारा आशेचा किरण जणू जाणवू लागला... 

दुसरा महत्वाचा पुढाकार म्हणजे माझ्या मामाच्या लहान मुलीचा अक्षया चा  नाटकाची संकल्पना आणि नाटकाची तारीख सांगितल्यानंतर तीने सम्पूर्ण तिच्या परिवाराला नाटक दाखवण्याचा केलेला  निर्धार हा खूप महत्वाचा होता... त्यामुळे, स्वातीच्या आणि माझ्या मामा कडील परिवार हे नाटकाच्या निमित्ताने एकत्र समोरासमोर आले होते... तेही सकारात्मक पुढाकरासाठी ...  


नाटकाची प्रस्तुति झाल्यानंतर परिवाराचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदललेला होता... एक वेगळीच ऊर्जा आणि वलय आणि वाढलेली वैचारिक उंची मला माझ्या आत जाणवत होती... यावेळी, रंगभूमीवर कलाकार म्हणून माझी भूमिका जगत असताना मला जाणवले... प्रत्येक भूमिका ही माझ्या अंतकरणातून येत आहे... नाटकातील संवाद हे केवळ संवाद नाहीत ते शब्द मी पहिल्यांदा बोलत असल्याचे मला जाणवू लागले... विशेष म्हणजे ज्योतिबा फुलेंचे चरित्र performe करत असताना सम्पूर्ण शरीरामध्ये अचानक मुंग्या आल्यात आणि मी  संवाद बोलत आहे ते संवाद माझ्या मुखातून आपोआप येत आहेत... मला एका क्षणात जाणवले... मी आता नाटक सादर नाही करत आहे... मी स्टेज वर आहे पण, स्टेज वर नाही मी त्या पुण्यातील फुले वाड्यात आहे आणि संवाद बोलत असताना माझ्यासमोर सावित्रीबाई आहेत आणि मी त्यांना शिकवत आहे... खूप अदभूत हा अनुभव मला जाणवला ... त्या सीन नंतर मी विंगेत आलो काही क्षणासाठी मी विसरून गेलो. आता नक्की काय सीन आहे... ? आणि कोणता सीन आहे...? थोडा वेळ स्वतः ला सावरलं आणि नाटकावर फोकस केलं...मला पुढे काय सीन आहे हे आठवत नव्हते... परंतु, योग्य वेळी ,योग्य संवाद , ढोल वाजवत असताना ते अगदी सहज येत होते... 

नाटक लोक- शास्त्र सावित्री चा पुण्यातील प्रयोग हा केवळ माझ्यासाठी प्रयोग नव्हता तर, एक कलाकार आणि व्यक्ती यांना एका वैचारिक उंचीवर घेऊन जाणारा आहे...

:- तुषार म्हस्के

आता ,

रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक  " लोक-शास्त्र सावित्री " चा प्रयोग 
28 मे 2022 रोजी , सकाळी 11:30 वाजता .
श्री. शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे प्रस्तुत होणार आहे..