Tuesday, 2 November 2021

मराठी रंगभूमी दिनानिमित्त,आम्ही मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतिशीलतेची प्रतिबद्धता साजरी करीत आहोत, नाटक "लोक-शास्त्र सावित्री" नाटकाने ! - थिएटर ऑफ रेलेवन्स रंगकर्मी


मराठी रंगभूमी दिनानिमित्त,आम्ही मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतिशीलतेची प्रतिबद्धता साजरी करीत आहोत, नाटक "लोक-शास्त्र सावित्री" नाटकाने ! - थिएटर ऑफ रेलेवन्स रंगकर्मी


मराठी रंगभूमी दिनानिमित्त                          
- माणुसकी
रा - रंग
ठी- ठेव
माणुसकीच्या रंगाची
ठेव आहे मराठी !
मर्म रहस्यांनी नटलेली
ठेव आहे मराठी !
ममत्वच्या रसाने उमटलेली
संस्कृती आहे मराठी !
रंग म्हणजे विचार
विचारांचा इंद्रधनुष आहे रंगभूमी !
माणसांमध्ये रंगाची उधळण करते रंगभूमी
माणसाला माणूस म्हणून घडवते रंगभूमी !
- मंजुल भारद्वाज

178 वर्षे पूर्ण झाली आहेत मराठी रंगभूमीच्या वाटचालीला, तरीही मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतीशीलतेची प्रतिबद्धता कुठे आहे ? जी रंगभूमी कधीकाळी आपल्या कलात्मक प्रगतीशिलतेतुन संपूर्ण देशाला सार्थक रंगकर्मासाठी प्रेरित करीत होती, त्याच रंगभूमीवर आज "वैचारिक नाटक चालत नाही" हे सावट का पसरले ?  रंगकर्मींनी हे समजून घेणे आवश्यक आहे की रंगकर्माची भूमिका ही समाजमनाची मशागत करण्याची आहे, त्यांच्यात मनुष्य असण्याची चेतना पेटवण्याची आहे. ना की समाजाच्या प्रश्नांपासून पळवाट काढण्याची !


पशु पासून माणसाला वेगळं करते ती त्याची वैचारिक क्षमता. म्हणूनच "वैचारिक नाटक चालत नाही !" या भ्रमाला हा नाट्य सिद्धांत आपल्या अनेक प्रस्तुतीतून गेले 29 वर्ष खोडत आला आहे. सातत्याने रंगभूमीवर विचारांचे नाटक प्रस्तुत करून प्रेक्षकांना माणूस म्हणून सृजित करणे आवश्यक आहे. इथे रंगचिंतक मंजुल भारद्वाज म्हणतात "विचार करण्याची क्षमता माणसांना जनावरांपासून वेगळी करते. जी लोकं हे म्हणतात की वैचारिक नाटक चालत नाही ते प्रेक्षकांना काय समजतात ?" दिवसभर कामाच्या रगाड्यातून बाहेर पडल्यावर परत वैचारिक नाटक बघण्यास कंटाळा येतो असे म्हणत प्रेक्षकांच्या वैचारिक चेतनेला नाकारणे समाजाला चेतनाहीन बनवणे आहे. प्रेक्षकांना विचारांनी मिळालेले आत्मिक समाधान त्यांच्या रोजच्या आयुष्यात एक नवचैतन्य भरते. आणि आयुष्य कंटाळवाणे न राहता जगण्याची नवदृष्टी प्रदान करते.  नाटक म्हणजे क्षणिक आनंद नाही तर आयुष्यभराची सात्विक ठेव आहे. माणसाला माणूस बनवते ती कला. कला जी प्रत्येक मानसिकता, सीमा तोडून मानवाला उंच भरारी देते.


 
    या मराठी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीचे वारसदार म्हणून आम्ही रंगभूमीला जिवंत ठेवण्यासाठी लॉकडाऊन च्या काळातही दोन नवीन नाटक मराठी रंगभूमीला दिले आहेत ते म्हणजे संविधानाचे मूल्य वाचवण्यासाठी धनंजय कुमार लिखित आणि मंजुल भारद्वाज अभिनित व दिग्दर्शित नाटक "सम्राट अशोक" आणि स्वतःतील सृजनकाराचा शोध घेण्यासाठी , सावित्रीच्या विचाराला घेऊन माणूस म्हणून अस्तित्व घडवणारे आणि  गाजवणारे मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक "लोक-शास्त्र सावित्री" !




    कलेची नुमाईश - म्हणजे केवळ कलेचे प्रदर्शन करणे. रंगकर्माला केवळ प्रदर्शनाच्या साच्यात बसवल्याने, रंगकर्माची व्यापकता , त्याचा प्रभाव आणि प्रगतिशील प्रवाहाच्या कक्षा अरुंद होतात.  
 समाजाच्या उन्नतीसाठी रंगभूमीला प्रस्थापित दुराग्रह मोडुन काढणे आवश्यक आहे आणि आम्ही मागील 29 वर्षांपासून सातत्याने रंगभूमीला पुनरुज्जीवन देत आहोत.
या संकटकाळात जिथे अखंड समाज, अखंड विश्व थांबले होते तिथे "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांताच्या रंगकर्मींनी  आपल्या रंगभूमीला श्वास दिला, प्राण दिला आहे !

      बाजारावादी मानसिकतेत अडकलेला समाज खरेदी आणि विक्रीच्या पलीकडे जात नाही तिथे आम्ही रंगकर्मी केवळ "नफा कमावण्यासाठी नाटक नव्हे तर माणुसकीची दृष्टी जागवण्यासाठी नाटक" या दृष्टी स्पष्टतेने रंगकर्म करत आहोत.
नाटक म्हणजे चेतना , विवेक आणि विचार पेटवणे. रंगभूमीला घडवणारे आम्ही प्रतिबद्ध रंगकर्मी रंगभूमीला घडवण्यासाठी रंगकर्माच्या तत्वाला जगतो, आणि ते म्हणजे कलेच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून समाजाला एक रचनात्मक दिशा देत माणसाला माणूस म्हणून जगण्यास उत्प्रेरीत करणे. मूर्च्छित झालेल्या समाजाला विचारांनी जिवंत करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.


संवाद म्हणजे आपल्या मतांचे, विचारांचे केलेले प्रवाही चिंतन. मग ते आत्म संवाद असू दे किंवा दोन स्वतंत्र व्यक्तीं मधील संवाद असू दे. संवादाचे अनन्य साधारण महत्व आपल्या जीवनात आहे. पण आजच्या या काळात अनेक संवाद माध्यम असूनही संवाद हरवत चालला आहे. संवाद म्हणजे केवळ शब्द बोलणे नाही तर संवाद एक अनुभूती आहे. आणि म्हणूनच "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांताच्या रंगकर्मींची ताकद आहे कलात्मक "रंग संवाद". नाटकाच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद करत नाटकाच्या व्याप्तीची आणि रंगभूमीच्या स्पर्शाची जाणीव आम्ही करून देत आहोत. आज समाज संवादहीन झालेला आहे, वाद - विवादात अडकलेला आहे, तिथे आम्ही रंगकर्मी आपल्या कलात्मक पुढाकाराने प्रत्येक प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना या कलात्मक रंगआंदोलनात सामील करत आहोत, त्यांची सहभागीता सुनिश्चित करत त्यांना प्रक्रियेशी जोडत आहोत. आपल्या रंगभूमीसाठी वैचारिक नाटकांना पाठिंबा देणारे प्रेक्षक निर्माण करत आहोत !



आम्ही "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतिशीलतेची प्रतिबद्धता साजरी करीत आहोत. रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित  "लोक-शास्त्र सावित्री" नाटकाच्या प्रस्तुतीने!
मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने नाटक "लोक-शास्त्र सावित्री " 7 नोव्हेंबर 2021,रविवारी, सकाळी 11.30 वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे प्रस्तुत होणार आहे.




Wednesday, 30 December 2020

सुप्रसिद्ध रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांचे युगपरिवर्तक नाटक “लोक-शास्त्र सावित्री” 3 जानेवारी 2021, रविवार रोजी, दुपारी 3 वाजता.मालती वैद्य स्मृती ट्रस्ट, बदलापूर (पूर्व) येथे प्रस्तुत होणार !

सुप्रसिद्ध रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांचे युगपरिवर्तक नाटकलोक-शास्त्र सावित्री” 3 जानेवारी 2021, रविवार रोजी, दुपारी 3 वाजता.मालती वैद्य स्मृती ट्रस्ट, बदलापूर (पूर्व) येथे प्रस्तुत होणार !


 थिएटर ऑफ रेलेवन्स चे शुभचिंतक आणि अभ्यासक माणुसकीचा समाज निर्माण करण्यासाठी , न्यायसंगत व्यवस्थेच्या निर्माणाचे क्रांतिकारी सूत्र घेऊन, नवी पिढी घडवण्याचा संकल्प करून, 3 जानेवारी २०२१ रविवार रोजी, दुपारी 3 वाजता  रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित युग परिवर्तक नाटक " लोक - शास्त्र सावित्री " प्रस्तुत करणार आहोत. हे नाटक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत बदलापूर येथे सादर होणार आहे...

 

कधी : 3 जानेवारी 2021रोजी, रविवार , दुपारी 3 वाजता.

 


कुठे : “मालती वैद्य स्मृती ट्रस्ट", बदलापूर (पूर्व).

 

कलाकार: अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, सुरेखा साळुंखे, साक्षी खामकर, तुषार म्हस्के, स्वाती वाघ, प्रियंका कांबळे,अमित राणे,हरिकृष्ण पुली.

 

वेळ : 70 मिनिटे

 

 एकाधिकारवादाने तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण मानव संस्कृतीला धुळीस मिळवले आहे. जागतिकीकरणाने मानवाचे वस्तुकरण करून त्याला  फक्त खरेदी विक्री करणारी उपभोगची सामग्री बनवली आहे .. आज आधुनिकतेच्या नावाखाली तंत्रज्ञानाने आख्या जगाचा विध्वंस केला आहे ...त्या विध्वंसाला प्रश्न विचारण्या ऐवजी आज वैचारिक रूपाने उध्वस्त झालेला समाज त्याला विकास म्हणत आहे ...

 


अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील, जेव्हा संपूर्ण राजनैतिक व्यवस्था विकली गेलेली आहे. सत्य-असत्याच्या पुढे जाऊन आणि निरंतर खोटे पसरवून समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या विकारांपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.

परंतु शोकांतिका आहे की, आज एकही सांस्कृतिक कर्मी जिवंत नाही , जो व्यवस्थेला भिडेल, याउलट पळवाटा शोधत आहे.दृष्टिहीन, विचारहीन गर्दी होत चाललेल्या समाजाला एक कलात्मक वळण देतो तो सृजनकार ! सृजनकार मानवीय चेतना जागवत प्रत्येक व्यक्तिच्या आत असलेल्या  कलात्मक पैलूंला स्पर्श करून नवीन काळ रचतात..

 

कोण आहे आज जो माणूस म्हणून जगतो ? सृजनकार म्हणून जगतो ? आणि निर्माण करतो ? सांस्कृतिक सृजनकार विवेकसंमत असतात. आपले विचार धैर्याने व्यक्त करताना मानवी कल्याणासाठी सत्याचा शोध घेतात.

 

असाच स्वतःच्या अस्तित्वाचा शोध

सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाईंनी घेतला होता.

सावित्री बाईंनी  पितृसत्ता ,सामंतवाद, जातीवाद यांच्या वर्चस्ववादाला आव्हान दिले होते.

सावित्रीबाई फुलेंनी अज्ञानाच्या फेऱ्यातून अखंड समाजाला बाहेर काढले. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनिष्ठ रुढींच्या गुलामीतून बाहेर  पडण्यासाठी समाजाला प्रेरित केले.

सावित्रीबाईंनी आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला होता...त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली परंतु त्याची धग जनमानसाच्या मनात अजूनही धगधगते का ?

 

असं म्हंटल जातं कि माणूस शिक्षणाने माणूस होतो पण खरंच तसं घडतं का ?.. शिक्षण माणसाला न्यायसंगत करते का ? आणि जर तसं आहे तर मग बहिणाबाई कोण होत्या ? बहिणाबाई तर अशिक्षित राहूनही माणूस म्हणून जगल्या.

सावित्रीबाई आणि बहिणाबाई हे दोन ध्रुव आहेत. एक आहे विचार म्हणून

अस्तित्व जागवण्याचं आणि दुसरे आहे जीवनदृष्टीने तत्व जगवण्याचे या दोघांचा एकत्र येण्याचा बिंदू आहे माणुसकी !

 

"नाटक "लोक- शास्त्र सावित्री"



 

जनमानसात सावित्रीची ओळख आहे, तिचे नाव आहे परंतु तीचे तत्व रुजले नाही, आणि हे   तत्व रुजवण्याची प्रक्रिया "लोक- शास्त्र सावित्री" हे नाटक करते. प्रत्येकाच्या मनात सावित्री जागी होते पण ती व्यवहाराच्या प्रहराने गळते, हे आपण ओळखले नाही तर ती गळत राहणार, हे नाटक त्याला चिन्हीत करते.

सावित्रीने दिशा दाखवली परंतु आपण जागतिकीकरणाने रचलेल्या वाटेवर मार्गक्रमण करत आलो. सावित्रीच्या वाटेवर चालणे म्हणजे विचारांच्या वाटेवर चालणे जे आज अभावाने घडते.

 

भारताची जनता आणि भारतीय महिला या दोघांचेही निर्णय कोणीतरी दुसरं घेतं आणि ते  सहन करतात, शोषणाचे बळी पडतात पण त्याच्याविरुद्ध आवाज उठवत नाहीत.

भारतात आज कितीजण आहेत जे सावित्रीच्या पुढाकाराने शिकले ,

पण सवित्री घडवू शकले नाहीत. कारण प्रश्न आहे रचनात्मक पुढाकाराचा, न्यायसंगत वागण्याचा, माणूस म्हणून जगण्याचामाझ्यासाठी पुढाकार कोण घेणार ? या मानसिकतेवर "लोक- शास्त्र सावित्री"

हे नाटक वैचारिक प्रहार करते.

 

कला माणसात विवेक जागवते, माणसाला माणूस असण्याचा बोध करून देते. म्हणूनच सांस्कृतिक क्रांतीचे सृजनकार या भूमिकेला अंगीकारण्याची ही वेळ आहे.

कलासत्वाला मानवतेसाठी विश्वाच्या सौहार्दासाठी रचणारा सृजनकार शाश्वत माणूस म्हणून काळासोबत लढतो. आपला काळ निर्माण करतो. "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाटयसिध्दांताचे  "लोक- शास्त्र सावित्री" हे नाटक युगपरिवर्ततनाचा काळ रचते.

 

परिवर्तनाच्या वाटेवर सांस्कृतिक सृजनकार मनुष्याला हिंसेपासून अहिंसेकडे, आत्महीनतेपासून आत्मबळाकडे, विकारांपासून विचारांकडे, वर्चस्ववादापासून समग्रतेकडे आणि व्यक्तीला सार्वभौमिकतेच्या प्राकृतिक न्याय आणि विविधतेचे सहअस्तित्व विवेकाच्या दिशेने उत्प्रेरित करतात.

 

नाटक "लोक- शास्त्र सावित्रीका ?

 

माणूस म्हणून जगण्यासाठी, न्यायसंगत समाज घडवण्यासाठी...स्वतःच्या आत सावित्री जागविण्यासाठी

सांस्कृतिक पुरोगामित्वाचा पाया रचण्यासाठी

सांस्कृतिक चेतना ही सार्वभौम अधिसत्ता आहे.

सांस्कृतिक सृजनकाराच्या भूमिकेत "लोक-शास्त्र सावित्री" हे नाटक समाजाच्या संवेदनांना त्यांच्या मृतवत अवस्थेला पेटवून जागे करणारे आहे.

 

1831 पासून आतापर्यंतच्या काळाचा आलेख घेतला तर लक्षात येईल, त्या काळापासून सुरू झालेले सांस्कृतिक प्रबोधन जागतिकीकरणाने संपवले आहे. .सावित्रीच्या प्रतिरोधाला प्रचारकी व्यक्तिवादाचे स्वरूप देऊन अलगदपणे सर्वसामान्य  केले.सावित्रीचा जो प्रतिरोध होता त्याची ताकद संपवली.आता हा प्रतिरोधाचा न्याय पताका घेऊन, "थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत" "लोक- शास्त्र सावित्री" या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा सावित्रीच्या महत्वाला, तिच्या विचाराला जनमानसात जागवत आहे.

सांस्कृतिक  सृजनकार म्हणून सांस्कृतिक चेतना पेटवण्यासाठी कलाकार आणि व्यक्तीची उन्मुक्तता साधणे हे कलात्मक सौंदर्य आहे. कलात्मक सौंदर्य समाजात रुजवणे सांस्कृतिक क्रांतीचा सूत्रपात आहे.

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत

 

मागील 28 वर्षांपासूनथिएटर ऑफ रेलेवन्सया नाटय़ सिद्धांताने सतत कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली जबाबदारी आणि कर्तव्ये निभावली आहेत. प्रेक्षकांच्या सहभागाच्या आधारावर मुंबईपासून मणिपूरपर्यंत हेरंग आंदोलनसुरू आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्सने जीवनाला नाटकाशी जोडून मागील 28 वर्षांपासून जातीय मुद्दय़ावरदूर से किसी ने आवाज़ दी’, बालमजुरीवरमेरा बचपनअशी, कौटुंबिक हिंसेवरद्वंद्व’, ‘मैं औरत हूँ’, लिंगनिदान या विषयावर नाटकलाडली’, जैविक आणि भौगोलिक विविधतेवरबी-7’ अशी नाटके रंगमंचावर आणली. मानवता आणि नैसर्गिक साधनसामग्रीच्या खासगीकरणाविरोधातड्रॉप बाय ड्रॉप : वॉटर’, मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठीगर्भ’, शेतकऱयांची आत्महत्या आणि शेतीच्या होणाऱ्या विनाशावरकिसानों का संघर्ष’, कलाकारांना कठपुतली बनवणाऱ्या आर्थिक तंत्रापासून कलाकारांच्या उन्मुक्ततेसाठी नाटकअनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स”,

शोषण आणि दमनकारी पितृसत्तेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकार देणारेन्याय के भंवर में भंवरी’, समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठीराजगतीअशा नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशीथिएटर ऑफ रेलेवन्सलढत आहे! आजच्या या कठीण काळातथिएटर ऑफ रेलेवन्सने सांस्कृतिक सृजनकार घडवण्याचा निर्धार केला आहे! समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या मंडळींपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.

 

रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्याविषयी :

 


लेखक - दिग्दर्शक "थिएटर ऑफ रेलेवन्सनाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार "थिएटर ऑफ रेलेवेंस" च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. ह्या अभिजात लेखक - दिग्दर्शकाने आजतागायत 28 पेक्षा अधिक नाटकांचे लेखन दिग्दर्शन केले आहे. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर थियेटर ऑफ रेलेवन्स सिद्धांताच्या माध्यमातून 1000 पेक्षा अधिक नाट्यकार्यशाळांचे संचालन केले आहे.