Sunday 19 February 2017

वादळाच्या अगोदर असणारी शांतता कधी कोणी पाहिली आहे का ? .

वादळाच्या अगोदर असणारी शांतता कधी कोणी पाहिली आहे का ? ....असा प्रश्न विचारला तर त्यात काहीच वावग नाही आहे ...मनात सतत निर्माण होत असणारी उष्णता, आज सर्वोच्च पातळीला जाऊन फक्त फुटण्याच्या मनस्थितित दिसू लागली...माझ्या जीवनात मला विचारले जाणारे प्रश्न तुला हे नाटकच करायचं होत तर शिकायची काय गरज होती ? आणि या मुलांचे वर्कशॉप घेत असताना जीवन जगायला शिकवतो ....आणि त्यात जीवनात आलेला ,येत असणारा अनुभव म्हणजे आपला अभ्यास .... 


पाठ्य पुस्तकाबरोबर जीवनाच्या पुस्तकात लिहायला आणि वाचायला शिकवतो .....अशीच ही शांतता विदर्भ विद्या मंदिर शा ळेमध्ये पसरली होती ....माझ 7 वी ते 10 वी च शिक्षण याचं शाळेत झालं त्यामुळे जीवन जगत असताना आलेले अनुभव आता ....त्या अनुभवाना सकारात्मक 



दृष्टि देऊन .... आत्म विचार रूपाने अनुभव देत होतो....आजच्या दिवसामध्ये इयत्ता 9 वी ची बैच होती ....सुरुवातीला गड़बड़ करणारे विद्यार्थी आम्ही आज काहीही न बोलता समोर जाऊन उभा राहीलो आणि आम्ही 4 रंगकर्मी नवीन रंग या किशोर अवस्थे मधील बालक आणि बालिका मध्ये पाहत होतो ....10 ते 15 मिनिटे शांत सर्व जन आम्ही 



कोणालाच काहीही बोलत नव्हतो थोड्या वेळाने सर्व जन शांत झाले ....एकदम कोलाहातील शांतता सर्वत्र पसरली होती ....फक्त नजरेने जग बदलता येत हेच डोळ्यात दिसत होते....कुठे ते शांत बस ....शांत बस ...सांगून न एकणारे विद्यार्थी आणि कुठे ते फक्त नजरेच्या खुनेने शांत बसणारे ....या शांततेनंतर या उर्जेचा रूपान्तर आता collective उर्जे मध्ये झालेले दिसलं ...




.आम्ही येण्याअगोदर कोणताही वाद्या चा उपयोग न करता छान अशा रिदम ची निर्मिती केली होती ....मग, त्या उर्जेला दिशा देण्यासाठी सर्वानी एका तालात एका सुरामध्ये रिदम वाजवायला सुरुवात केली ....आणि हे वादळ जे नवीन दृष्टी, कल्पकतेच्या पुढे घेऊन जाणारं दिसलं ...



.एका सुरात आणि एका तालात सर्व जण वाजवू लागले याच बरोबर सर्वांच्या मनात वेग - वेगळे प्रश्न निर्माण झालेले दिसले .....मैत्री म्हणजे कशी असावी यावर नाटक करायला वेळ दिला ....त्याच बरोबर काही गटांनी समाजातील विषमता असं, त्यांनीच विषयाची निवड केली ....आत मध्ये खूप ऊर्जा पण, ज्यावेळी ती वयक्तिक उर्जे मध्ये परावर्तित होत असते त्या वेळी ती दबलेली असते ...



.भीड मध्ये कोणीही येऊन टपली मारून जावं ...पण, समोर उभा राहून बोलणारे कमी मग, त्यांना दिशा देत त्यातून व्यक्ती ला बोलतं केला ...आवाजाचा चढ उतार , त्याच बरोबर आलाप , हमींग करत पळनं....वेगवेगळ्या आकृती मधून शाळा, गाव , शहर, पक्षी झाडे जंगल अशी वेगवेगळी रूपे आकार घेऊन त्वरित imagination मध्ये भर पड़त असताना दिसू लागले .....काहिंचे चेहरे चमकू लागले , काहिजन acitve झाले , काहिजन प्रश्नांची उत्तरे देऊ लागले ...असे हे क्षणा क्षणाला बदल होताना दिसू लागले ....याच उर्जेमध्ये स्वतः ला या उन्हामध्ये तापवून तप करणारे हे स्वतः च्या शोधात धावणारे विद्यार्थी अगदी विशाल 

जीवनाच्या समुद्रात सत्व शोधताना दिसू लागले....जीवनात कधीही नाटक केलं नाही ...असे स्टेज होल्ड करून ठेवायला शिकले ....ही माझ्या विश्वातिल जागा आहे याची जाणीव त्यांना झाली आवाजामध्ये बदल दिसून आला ... नाटकाचं सादरीकरन म्हणजे ,त्यांनी स्वतः च्या विचारांचा केलेला अभिव्यकपणा 
शांतते नंतर ऊर्जेला दिशा ,प्रश्न त्याच बरोबर अभिव्यक्त होणं हे ToR च्या प्रक्रियेतून समोर येत असताना दिसू लागले.

रंगकर्मी
तुषार म्हस्के

No comments:

Post a Comment