Wednesday 21 March 2018

कोलाहल , धावपळ एवढ्या प्रमाणात वाढली आहे. की, एक क्षण मिळत नाही. ज्यामुळे स्वतः साठी वेळ काढता येईल. सुख आणि समाधान मिळवण्यासाठी माणूस दिवस रात्र संघर्ष करत असतो. दुनियादारी एवढ्या प्रमाणात वाढते की, त्यात स्वतःसाठी असणारा वेळ मिळत नाही..


या दुनियादारी , बाजारीकरणाच्या कोलाहलात ... माझं मत माझा अधिकार , माझी दृष्टी गायब होऊन जाते... व्यक्ती च चक्र स्वतः पर्यंत राहत नाही .
बाजारीकरणाच्या युगात ज्याठिकाणी वस्तु प्रमाणे तयार होत असणारी मानसिकता व्यक्तीच व्यक्तीमत्व सम्पवून त्याला एकाच साचात टाकते . एकाधिकाराची शर्यत एकाच वेळी सर्वांची सुरू होऊन जाते. अशा या शर्यतीमध्ये सत्ता पिळवणूक करते.. बाजारवाद हा फक्त नफा आणि नफा शोधून व्यक्तीची पिळवणूक करून घेतो... कारण, एखादा स्टार असेल तर त्याला brand बनायचं असत ... त्याला व्यक्तीमत्व बनायचं नसतं...Brand हे फक्त वस्तु असण्याची जाणीव करून देते... कारण, निर्णय घेण्याचा अधिकार हा वस्तू ला नसतो ...

अशा ह्या बाजारीकरणाच्या मानसिकतेला तोडून . व्यक्तीला स्वतःच्या अस्तित्वासाठी , निर्माणासाठी मार्ग दाखवणारा रस्ता म्हणजे थिएटर ऑफ रेलेवन्स नाटय सिद्धांत ...
आपल्या कलेच्या जोरावर समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये कार्य करणार हे तत्व आपल्या कलात्मक यात्रेची 25 वर्षे पूर्ण करत ...दिल्ली , मुंबई ,पनवेल आणि आता ठाणे मध्ये नाटय महोत्सवाचे आयोजन करत ...
मानावतेला जिवंत ठेवणारे नाटक - गर्भ , कलाकारांच्या उन्मुक्ततेचा नाद "अनहद नाद - Unheard Sounds of Universe " समाजात न्याय संगत व्यवस्थेसाठी नाटक "न्याय के भंवर में भंवरी "
या कलात्मक नाटकांचा महोत्सव - गडकरी रंगायतन , ठाणे येथे ,27 , 28 आणि 29 मार्च, 2018 ला होणार आहे ...
या जगुयात आपल्या असण्याचा ,जाणिवेचा हा क्षण...
#थिएटरऑफरेलेवन्स
 #ठाणे: नाट्यमहोत्सव
#गडकरी रंगायतन
रंगकर्मी
तुषार म्हस्के