Sunday 23 December 2018

" सरकारचा दुटप्पीपणा ...तुषार म्हस्के "

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब जरा विचार करा ..” शेतकऱ्यांनी ऊस लावू नका, साखरेचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. ती आणखी जास्त झाली तर ती समुद्रात टाकण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे सांगली येथे बोलताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान ह्या देशात साखर जास्त झाल्यामुळे पाकिस्तानने साखर भारतात निर्यात केली . पण, आपल्या भारतात असणार प्रकरण उलट आहे. इथे उत्पन्न झाल्यावर शेतकऱ्यांना उत्पन्न बदलण्याचा सल्ला  आपण देतात.

एका बाजूला हिंदू राष्ट्रवाद , दुसऱ्या बाजूला पाकिस्तान हा दुश्मन आणि मागून हात मिळवणी. चांगल आहे जनता आपली मुर्खासारखी राष्ट्रभक्ती च्या नावाखाली एकमेकांच्या मानेवर सुरी आणि चाकू ठेवते.



साखरेच प्रमाण जास्त होणारच ना !  गडकरी साहेब कारण  , केंद्र सरकारने जास्त प्रमाणात साखर पाकिस्तान हून मागवली आहे. म्हणजे बळीराजाच्या हक्काच्या नावाने अनेक योजना आणायच्या दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच पिक व्यवस्थित झाल्यावर बाहेरच्या देशातून भारतात माल मागवायचा म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हामि भाव कसा मिळेल. पिक चांगल येत नाही म्हणून मारामार आणि पिक चांगलं झाल्यावर सरकारचा मार .

साखरेचा साठा मोठ्या प्रमाणात झाला हि , काही शेतकऱ्यांची चूक नाही  . ह्यावेळी , शक्य होत साखरेला योग्य भाव मिळेल.केंद्र सरकारने साखर  पाकिस्तानातून आणण्याची गरज नव्हती. सर्जिकल स्ट्राईक चा वर्धापन साजरे करणारे सरकार पुन्हा पाकिस्तानातून साखर निर्यात करते. जनतेची राष्ट्रवादाच्या नावाखाली दिशाभूल करायची आणि मित्रता शासनाने जोपासायची.

दिनांक २३ डिसेम्बर, २०१८ ला सांगली येथे झालेल्या नितीन गडकरी यांच्या भाषणात आलेला साखरे बाबत विषय हा न पटणारा वाटतो . कारण ,  शासनाची जबाबदारी आहे भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण. इथे , भूमिपुत्र राहतात बाजूला आणि सल्ले मिळतात कारण नसताना ....

रंगकर्मी 
तुषार म्हस्के

Tuesday 18 December 2018

आयुष्यात जगलेल्या क्षणांना पुन्हा त्यांच्यातील सूत्र शोधण्याची दृष्टी थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांताने मला दिली.. तुषार म्हस्के

                                         

मी माझ्या guts  फीलिंग ला घेऊन स्वतः च अस्तित्व निर्माण करण्याचा प्रश्न   माझ्या डोळ्यासमोर आणला.. जगावेगळं जगण्याचा विचार करणारे कमी असतात .. अशा ह्या खडतर वाटेवर चालण्याचा निर्णय मी  घेतला. माहिती नव्हतं रस्ता काय आहे? हा रस्ता मला कुठे घेऊन जाणार आहे . काय होणार आहे माझ्या सोबत ... काहीच नव्हतं माहित मला त्या क्षणी ...
नाही .. मला जगायचं आहे .. मला माझे अस्तित्व निर्माण करायचं आहे... माझी ओळख मला बनवायची आहे...खानदानात कोणी केलं नाही ते काम मला करायचं आहे... माझं व्यक्तिमत्व मला निर्माण करायचं आहे. काय होतं त्यावेळी माझ्याकडे , जिद्द ? हो  फक्त आणि फक्त जिद्द !!!... तो madness
वेड्या सारखा स्वतःचा शोध घेण्याची सुरवात झाली... बेधुंद काम करत असताना ... एवढंच माहित होत... रंगकर्म मला येत नाही... ह्याचा अर्थ मला ते आयुष्यभर तसेच न येत असल्याचा शिक्का तर लावायचा नाही... मला उठायचं आहे. मला करायचं आहे . मला शोधायचं आहे...मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे..
प्रस्थपित सत्तेला आवाहन देत ...स्वतःच्या आत असणाऱ्या रंगांना शोधण्यात माझं ध्येय माझ्या डोळ्यासमोर येऊन उभे राहिले...
" हो मी मान्य करतो मला काहीच येत नव्हतं ... रंगमंचाची ओळख मला काहीच माहित नव्हतं...



ती रात्र आठवते... त्या रात्री मी गहिवरलेल्या डोळ्यांनी  मंचावर प्रवेश केला ...माझ्या कानावर आवाज येऊन पडला " स्वागतम , सुस्वागतम .... या विश्वाच्या रंगमंचावर तुझं स्वागत आहे... अरे , वेड्या बघतोस काय .. चल पाऊल टाक पुढे ... डोळ्यातून एक - एक थेंब पाणी पडत होते... पुन्हा आवाज येऊ लागला  मी इकडे - तिकडे पाहू लागलो.. अरे, वेड्या इकडे - तिकडे पाहतोस काय... हा रंगमंच तुझं स्वागत करतोय " काय होता तो आवाज ... कोणाचा होता तो आवाज ... जो माझ्यातील कलाकाराचं स्थायी अस्तित्व टिकवून ठेवतोय ...जो सतत मला निष्क्रिय क्षणाची जाणीव करून देतोय. जो तेवत ठेवतोय ज्योत माझ्यातील कलेची ,  माझ्या अस्तित्वाची !!! हो , मी शोधतोय माझ्यातील ... कलागुण ... माझ्यातील साधना ... ज्या साधनेने माझ्यातील व्यक्ती आणि कलाकार ह्या दोघांना निर्माण केले.. प्रेरणेंच्या झोतात निर्माण केलेल्या माझ्यातील विचारांना ... Decode करतोय माझी लाईफ जी मी जगलेलो... शोधतोय ते सूत्र ज्या सूत्रांनी माझ्यातील अस्तित्व निर्माण केलेलं...
आयुष्यात जगलेल्या क्षणांना पुन्हा त्यांच्यातील सूत्र शोधण्याची दृष्टी थिएटर ऑफ  रेलेवंस नाट्य सिद्धांताने मला दिली..




दिनांक 15 ते 17 डिसेंम्बर ,2018
युसूफ मेहरअली सेंटर, पनवेल
उत्प्रेरक :- मंजुल भारद्वाज

तुषार म्हस्के

Monday 3 December 2018

रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य तत्वज्ञानाने मराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया!
- योगिनी चौक


मराठी रंगभूमीवर विविध नवनवीन प्रयोग सातत्याने होत असताना 'वैचारिक मूल्य' रुजवणारी व्यावसायिक नाटके असावीत हे स्वप्न मी चार वर्षांपूर्वी पाहिले... 



मी व्यावसायिक नाटकांत काम करत असताना आजूबाजूलाकॉमेडी नाटकेच चालतात”, “फेस व्हॅल्यू असणारे कलाकारच हवेत”, “वैचारिक वगैरे ते प्रायोगिक वाले बघून घेतील, आपण धंदा पाहावाअशा विचारसरणीचे वातावरण दिसले. नाटकांचे विषय देखील बहुतांशी नवरा, बायको, लग्न, दारू... याच विषयांभोवती फिरत होते, नाटकांत, प्रामुख्याने व्यावसायिक पातळीवर वैचारिक दर्जा कसा निर्माण करता येईल आणि तो टिकून कसा राहिल या विचारातूनच मराठी रंगभूमी वर रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित "अनहद नाद - Unheard Sounds Of Universe" हे बहुभाषिक नाटक आले आणि गेल्या साडे तीन वर्षांपासून सतत या नाटकाचे प्रयोग होत आहेत.


सतत साडे तीन वर्षे सातत्याने मराठी व्यावसायिक रंगभूमीवर वैचारिक नाटकांचे प्रयोग करून मराठी रंगभूमी वरील पाच प्रतिबद्ध युवा कलाकारांनी हे शिवधनुष्य कोणत्याही निर्मात्याची मदत घेता किंवा कोणतीही सरकारी वा निमसरकारी ग्रांट घेता, कुठलीही स्पॉन्सरशीप स्वीकारता केवळ जनसहयोगाने नाट्य प्रयोग सुरु ठेऊन कला उद्योजकतेचा नवा पाया रचला आहे.



थिएटर ऑफ रेलवन्स या नाट्य तत्वाला 25 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने रंगचिंतक मंजुळ भारद्वाज लिखित दिग्दर्शित नाटकांचा नाट्य महोत्सव संपूर्ण वर्षभर उत्सव स्वरूपात साजरा करण्यात आला. देशाची राजधानी दिल्ली पासून सुरू झालेला हा नाट्य महोत्सव आर्थिक राजधानी मुंबई ते ठाणे व्हाया पनवेल सांस्कृतिक राजधानी पुणे असा प्रवास करत सुरू आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे नुसतं एखाद दुसरा प्रयोग करून ही नाटके थांबली नाहीत तर सतत सातत्याने या क्लासिक नाटकांचे प्रयोग होत आहेत आणि नुसते प्रयोगच नाही तर नाट्य महोत्सव साजरे होत आहेत

पूर्वी होत असलेल्या आणि आता लोप पावत चाललेल्या वेळेचा सदुपयोग ही या महोत्सवाच्या काळात करण्यात आला तो म्हणजे मुंबई तील दादर शिवाजी मंदिर येथील नाट्य महोत्सवात तिन्ही दिवस लागोपाठ सकाळी 11वाजता नाट्य प्रयोग सादर झाले आणि ते देखील शनिवार रविवार नसताना मधल्या दिवसांत! आणि या महोत्सवात तिन्ही दिवस प्रेक्षक उपस्थित होते

वेळ सकाळची असो, दुपारची असो वा प्राईम टाइम प्रत्येक स्लॉट वापरून पाहिला आणि उत्तम वैचारिक नाटक पाहण्यासाठी कोणताहीस्लॉटमहत्वाचा नसूनविचारमहत्वाचा आणि तो ऐकण्यासाठी सकाळी 7 च्या प्रयोगाला ही वेळेवर हजर राहणारे प्रतिबद्ध प्रेक्षक आम्हांला लाभले.




नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर प्रेक्षक संवाद या प्रक्रियेत असताना प्रेक्षक व्यक्त होत की, “ही नाटके म्हणजे वैचारिक औषध आहे.” आणि औषध घ्यायला आपण मेडिकल मध्ये जसे रात्री 2 वाजता ही जातो तसे हे वैचारिक औषध सकाळच्या प्रयोगातून घेतल्यास दिवसभर त्या विचाराचे मनन होत राहते दुसऱ्या दिवशी त्या विचारला पुढे नेणारी श्रुंखला अनुभवायास मिळते. अशा प्रकारे हा तीन दिवसीयवैचारिक नाट्य डोसमाणूस म्हणून जगण्याचे विचार पेरण्यास प्रतिबद्ध असतो. “ही नाटके काळाची गरज आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहेअसेही मत एकमताने समोर आले.
दिल्ली, मुंबई आणि पुणे येथील महत्वाच्या व्यावसायिक नाट्यगृहात थियेटर ऑफ रेलेवन्स या नाट्य तत्वावर आधारित तीन दिवसीय नाट्य महोत्सवात लागोपाठ तीन वैचारिक आणि क्लासिक नाटकांचे प्रयोग झाले

गर्भ, अनहद नाद आणि न्याय के भंवर में भंवरी!

1. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात मनुष्य रुपी देहांत 'माणुसकीला' शोधणारे नाटकगर्भ

2. खरेदी आणि विक्री च्या काळात कलाकारांना वस्तुकरणातून उन्मुक्त करणारे नाटक
अनहद नाद – Unheard Sounds of Universe”
आणि 
)अर्ध्या लोकसंख्येचा आवाज. पितृसत्तात्मक व्यवस्थेच्या शोषणा विरुद्ध हुंकार, न्याय आणि समतेची गाज, नाटक आहे, “न्याय के भंवर में भंवरी”!

या कलात्मक मिशनाला आपल्या कलेने मंचावर साकार करणारे कलाकार आहेत अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, बेट्सी एंड्रयूज आणि बबली रावत!
या प्रतिबद्ध युवा कलाकारांनी मराठी रंगभूमीवर वैचारिक नाटकांची नवी मुहूर्तमेढ रचली आणि त्याचे प्रयोग संवाद आणि कला उद्योजकतेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवले. प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद करून त्यांना नाट्य संकल्पनेची पूर्वकल्पना दिल्याने प्रेक्षकांना पुन्हा नाटकाकडे आणि ते ही वैचारिक नाटकांकडे वळवण्यास आम्ही यशस्वी झालो आणि प्रेक्षक संवादातुन प्रेक्षकांची नाटक पाहण्याची आवड़ काय? त्यांना कशा पद्धतीचे नाटक पाहण्यात interest आहे हा एक प्रकारे सर्वे झाला आणि त्यात वैचारिक नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकच नाही तर तिकिट घेऊन पाहायला तयार आहेत हे प्रेक्षकांनीच दाखवुन दिले आणि हजेरी लावली!
या नाट्य महोत्सवला सामान्य प्रेक्षकांपासून ते जाणकारां पर्यंत अनेक मान्यवरांनी हजेरी लावली .


९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी हे थिएटर ऑफ रेलवन्स च्या कलात्मक नाट्य महोत्सवाचे कौतूक करताना लिहितात, “तीन दिवस मी अनुभवले सर्वांग सुंदर अनुभव, माणूस म्हणून उन्नत झालो, माणूस म्हणून माझी कर्तव्य काय याचं बोधीज्ञान, knowledge मला मिळालं आणि हाच तर कलेचा हेतू!”
कला ही केवळ मनोरंजना इतकीच मर्यादित पाहता मनोरंजन ते परिवर्तन असा प्रवास थिएटर ऑफ रेलवन्स तत्वज्ञानावर आधारित मंजुळ भारद्वाज लिखित नाटके करत असतात आणि कोणत्याही राजाश्रयावर अवलंबून राहता संवादाच्या माध्यमातून जन सहयोगाने ही नाटके समाजात नवं परिवर्तन घडवून आणत आहेत !


Friday 30 November 2018

मराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांची सुरुवात माझ्या "अनहद नाद - Unheard Sounds of Universe" या वैचारिक नाटकाने ! ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचे "थिएटर ऑफ रेलेवंस" नाट्य सिद्धांताच्या अभ्यासकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि त्यांनी घेतलेली वैचारिक नाटकाची नोंद म्हणून त्यांचा हा लेख..


कलेचा हेतू... मानवी उन्नयन

- प्रेमानंद गजवी







थिएटर ऑफ रिलेवन्स ही संकल्पना घेऊन रंगकर्मी मंजुल भारद्वाज हे गेली २५ वर्षे देश आणि परदेशात नाटकं करत आहेत. आपल्या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी नुकताच एक नाट्यमहोत्सव मुंबईत भरवला होता, त्याचा वेध-

एखादी नाट्यसंस्था पंचवीस वर्ष टिकून राहणं ही मोठी नवलाईची गोष्ट आहे, आजच्या काळात! बरेचदा ग्रुप तयार होतो आणि त्याचवेळी तो तोडता कसा येईल याचा विचार एखादा न्रतद्रष्ट मेंदू करीत असतो. असा कुणी 'थिएटर ऑफ रेलेवन्स' मधे नसेलच असं खात्रीपूर्वक नाही सांगता येत पण असं संकट येताना दिसलं तर... डोळ्यातलं 'कुसळ' अलगद दूर करून आपलं ध्येय कौशल्यानं पुढे नेणं, हे महत्त्वाचं, आणि ध्येय काय? तर कलेनं केवळ कलेसाठीच न राबता समाजासाठी कष्टरत होऊन त्यांच्या जीवनाचा एक भाग होणं, हे आजच्या केवळ पैशांचा विचार करीत असलेल्या जगात केवढं कठीण!

पण मंजुल भारद्वाज हा एक असा रंगकर्मी... खरं तर प्रथम लेखक... असा लेखक, ज्याची लेखक-नाटककार म्हणून स्वतःची एक दृष्टी आहे. म्हणूनच तो 'कलेसाठी कला' या सूत्रात अडकून पडला नाही तर 'जीवनासाठी कला' असा विचार करीत असतानाच त्याच्याही नकळत 'ज्ञानासाठी कला' Art for knowledgeकडे तो झेपावला आहे आणि त्यातूनच त्यानं सिद्ध केलंय, 'कला कुणाची बटीक नसते आणि बटीक असते ती कला नसते.' बटीकपण नाकारत मंजुल म्हणतो, 'कलेनं मनोरंजनाच्या सीमा तोडून जीवन कसं जगलं पाहिजे, हे सांगितलं पाहिजे' म्हणजेच जीवन कसं जगावं याचं ज्ञान (knowledge) दिलं पाहिजे कलेने आणि म्हणून तीन दिवस... दि. १५-१६-१७ नोव्हेंबर २०१७; सकाळी ११ वाजता ' थिएटर ऑफ रेलेवन्स' ची पंचवीस वर्ष अतिशय उत्साहात संपन्न होतात.

मंजुल भारद्वाज आणि त्याची टीम प्रचंड उत्साहात. पहिली बेल होते, मी थिएटरमध्ये प्रवेश करतो. थिएटर, शिवाजी मंदिर. पडदा तसा उघडाच, बेल होऊनही. दुसरी बेल... तिसरी बेल... मंजुल भारद्वाज थिएटर मध्ये प्रवेशतो. मी हात मिळवायला पुढे. मी शुभेच्छा देतो आणि इनमीन १०-१२ प्रेक्षक बघून म्हणतो, 'पैसों का क्या?' तोच धागा पकडून तो म्हणतो, 'पैशाची चिंता करत नाही, पैशाची चिंता करत बसलो तर काहीच करता येणार नाही' आणि नाटकाची रूपरेखा सांगू लागतो.

'गर्भ' लेखक/दिग्दर्शक मंजुल भारद्वाज आणि नाटकाचा विषय : माणसानं आयुष्यभर माणूसपण सिद्ध करणं. किती अवघड आहे आपल्यातील माणूसपण सिद्ध करत राहणं! अगदी झोपेत सुद्धा? झोपेचं काय, गर्भात सुद्धा आपल्या माणूसपणाची कसोटी लागते. गर्भ धारणेपासूनच गर्भावर बाह्य संस्कार होतात. म्हणजे आई जो विचार करते, तोच विचार पेरला जातो गर्भाच्या मेंदूत. माता नकारार्थी विचार करत असेल तर...किंवा माताच मनात म्हणत असेल, बाहेरचं हे जग किती क्रूर आणि त्याचवेळी गर्भाच्या मनात प्रश्न येत असेल, 'अशा क्रूर जगात मी कशाला येऊ?' तर?

इथं मी नाटकाची कथा सांगणं आणि ती तुम्ही वाचणं, एक निरर्थक वेळ दवडणं आहे. मंजुलचं निवेदन संपतं आणि मंचावर प्रवेश गर्भाचा...आणि पहिलाच हुंकार, 'कुदरत- बेमिसाल- अद्भुत. अश्विनी नांदेडकरचा तो 'हुंकार' ९० मिनिटं आपल्याला हाकारत राहतो, पण ती एकटीच नाही. सोबतीला आहेत योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के. नाटक मातेच्या गर्भातून पृथ्वीतलावर येण्यापूर्वीच कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागेल याचं दर्शन घडवंत. जग वाईट असलं तरी सुंदरही आहे, हे सांगतं. खरं म्हणजे हे शब्दांत सांगणं कमीच आहे. प्रत्यक्ष प्रयोग अनुभवणं उत्तम! विविध आकृतिबंध कलावंतांनी साकारलेले; अगदी 'गर्भाशय' देखील. प्रकाश योजनेची उत्तम सोबत, प्रकाश योजना होती असं जाणवतच नाही. तीच गत नीला भागवत यांच्या संगीताची. अरे हे मी का सांगत बसलो, 'प्रयोग अनुभवणं उत्तम' म्हटल्यावर?

दुसऱ्या दिवशी १६ नोव्हेंम्बर १७, 'अनहद नाद' म्हणजे Unheard sounds of Universe! पद्धत तीच सादरीकरणाची. पडदा उघडाच आहे आणि मंजुल भारद्वाज नाटकाची पार्श्वभूमी सांगतोय. निसर्ग विविध ध्वनींनी आपल्या आजूबाजूला वावरतो की आपण निसर्गाच्या हृदयातील विविध ध्वनींच्या सान्निध्यात जगतो? जलाशयाचं खळाळा वाहणं - त्या वाहण्याचा झुळझुळणारा अनहद ध्वनी... जगण्याचा ध्वनी, आणि हे जगणं सुंदर व्हायचं असेल तर जगण्याचाही एक अनहद ध्वनी ऐकता यायला हवा.

'गर्भ' मध्ये अश्विनी तर 'अनहद नाद' मध्ये योगिनी चौक. कमाल. त्यातील आशयसूत्रातील एक वाक्य, नव्हे निव्वळ एक शब्द... 'भागले या भाग ले'. जीवनाचं सारं सूत्र 'भागले; या भाग ले' या शब्दांत सांगितलं आहे. नाटककार एका शब्दाशी खेळून शब्द अर्थवाहित्व सिद्ध करतो. शब्दकाव्य समोर ठेवतो. गर्भ पेक्षाही हा प्रयोग विविध आकृतिबंधांनी नटला आहे, पक्ष्यांचा आवाज, शीळ, झाडाच्या फांद्यांची सळसळ, दिग्दर्शकानं आपलं सारं कसब इथं रितं केलंय. एक बारीकसा दोष या प्रयोगातील वेशभूषेतला, योगिनी चौक, कोमल खामकर, अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर सगळे अंगावर जॅकीट घालतात, तर मग तुषार म्हस्केच तेवढा का नाही? योगिनी मुख्य भूमिका जगते पण बाकीचे चौघे नसतील तर... सारं निरर्थक आहे. इतका 'एकरूप' प्रयोग आहे. सुंदर.

तिसऱ्या दिवशी 'न्याय के भंवर में भंवरी'. सादरीकरण पद्धत तशीच, पडदा उघडाच आहे. दिग्दर्शक मंजुल पार्श्वभूमी सांगतो नि प्रयोग सुरू होतो. भंवरी वर जो बलात्काराचा प्रसंग ओढवला तो आपण सारे सूज्ञ जाणतो. सर्व समान आहेत, पण काही अधिक समान आहेत. या अधिक समान घटकांतील न्यायाधीशानं समान घटकांतील भंवरीला काय न्याय दिला? 'मनू कायद्या'नुसार भंवरी वर बलात्कार झालाच नाही. स्त्री जीवनाचे सारेच दुष्टत्व. लहानपणी वडिलांच्या, मोठेपणी नवऱ्याच्या आणि म्हातारपणी मुलाच्या धाकात राहण्याची शिक्षा स्त्री भोगत असते. शहरातील शिकलेल्या स्त्रियांचं ठीक. खरंतर ठीकच. पण खेड्यातील चित्र आजही भयाण आहे. डोक्यावरचा पल्लू आजही तसाच डोक्यावर, चेहरा लपवून. बबली रावत भंवरी जगली आणि प्रत्येक स्त्री एक भंवरी आहे, हे लेखनसूत्र नजाकतीने समोर ठेवलं. हा एकपात्री प्रयोग, पण एकपात्री वाटला नाही कारण सशक्त लेखन-दिग्दर्शन आणि अभिनय.

तिन्ही दिवस निखिल आणि शिवाजी यांची प्रकाशयोजना आणि संगीताची सुंदर सोबत. तीनही दिवस प्रयोग संपल्यानंतर प्रेक्षकांना स्टेज वर बोलवून कलावंत, लेखक, दिग्दर्शक तसेच प्रकाश योजनाकार, संगीतकार आणि प्रेक्षक यांच्यात घडलेला संवाद अधिक प्रेरणादायी होता.

कला क्रांती करू शकते? थेट उत्तर 'नाही' असंच दिलं जातं पण कला लोकांना 'क्रांतिप्रवण' करू शकते, एवढं खरं. शिवाजी मंदिरमध्ये घडलेल्या या तीन दिवसीय नाट्य महोत्सवास प्रेक्षक प्रतिसाद कमी होता, पण आपली पंचवीस वर्षे पूर्ण करणं आणि त्या कौतुकलेल्या वातावरणात मंजुल भारद्वाज यांचं रंगमंचीय कर्तृत्व बघून संजय आवटे यांनी 'आचार्य' ही पदवी बहाल करणे, यातच या तीन दिवसीय महोत्सवाचं मूल्य अधोरेखित होतं.

तीन दिवस मी अनुभवले, सर्वांग सुंदर अनुभव. माणूस म्हणून उन्नत झालो. माणूस म्हणून माझी कर्तव्यं काय याचं बोधीज्ञान... knowledge मला मिळालं. हाच तर कलेचा हेतू!

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manjul-bhardwaj/articleshow/62096018.cms?utm_source=facebook.com&utm_medium=referral


#viral #मराठी_रंगभूमीवर_वैचारिक_मूल्यांची_सुरुवात_माझ्या_अनहद_नाद_Unheard_Sounds_of_Universe 
#manjulbhardwaj #play #premanandgajvi #maharashtratimes

हे रंगभूमी तुला हा रंगकर्मी आवाहन करत आहे...तुषार म्हस्के

रंगभूमी तुला आता सज्ज व्हायचं आहे...
निर्माण केलेल्या कलेला आणि कलाकाराला जिवंत ठेवायचं आहे...
विचारवंत कलाकारांची निर्मिती करायची आहे... 
मरगळ आलेल्या मनाला आता जाग कर,नवतेजाने पुन्हा कलेची पालवी या जनमानसात फुलवायची आहे...
बाजारीकरणाच्या या संसारात गळत असणाऱ्या तुझ्या शरीराचं विरघळण तुला थांबवायचं आहे...
नवीन उमेदीची नवीन सृष्टी अजून तुला निर्माण करायची आहे... 
तुझ्या दुखापेक्षा आठव तो क्षण ज्या क्षणी 
एका ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतोय ... त्याच क्षणात निर्माण होत असणाऱ्या व्यक्तीच्या विकारांना संपवायचं आहे... 
बघ उघड्या डोळ्यांनी तो क्षण ज्या ठिकाणी एका बाजूला देवीची पूजा होते दुसऱ्या क्षणी तिच्यावर बलात्कार होतोय..त्याच विकृतीला तुला थांबवायचं आहे ...



बघ तो क्षण ज्या क्षणाला तू तरुणांना जगण्याची उमेद देतेस त्यांच्या विचारांना सकारात्मक दिशा देऊन 'वाल्याचा वाल्मिकी' बनवतेस , त्यांना मायेचा पदर देऊन एक आदर्श म्हणून डोळ्यासमोर उभं करतेस अशा असंख्य तरुणांना तुला उभं करायचं आहे...
आठव तो क्षण ज्या क्षणाला तू आपल्या अस्तित्वाच्या निर्माणासाठी लढलेली लढाई,जी महिलांना सावित्रीबाई फुले च्या ज्ञानाची ज्योत घेऊन बाहेर पडून आपल्या ध्येयाला आपल्या कलेबरोबर जोडत एक आदर्श समाज रचना करतेस " महिला वस्तू नाही मनुष्य आहे " मनुष्य म्हणून स्वीकार कर ह्या विचाराला तू रुजवतेस ... अशा असंख्य महिलांना सक्षम करून एक न्यायप्रिय समाज बनवायचा आहे ... 
बाजारीकरणाच्या चक्रव्यूहात अडकलेली रंगभूमी आणि कलाकार यांना तू उन्मुक्त केलंस आता एक नव्या उमेदीच्या नवीन रंगकर्मींची पिढी तुला तयार करायची...
तुझ्या भोवती निर्माण होणाऱ्या नकारात्मक उर्जेला तुला आपल्या कलेने सकारात्मक करायचं ... घाबरू नकोस हे " माय - रंगभूमी " एक कलाकार म्हणून रंगकर्म करण्यासाठी हा रंगकर्मी सज्ज आहे... 
असंख्य वेदना संवेदना घेऊन इच्छा पूर्ती करणारी " रंगभूमी " तुला पुन्हा नव्या थाटात उभं राहायचं आहे...
देशात निर्माण झालेल्या विकारांना संपवण्यासाठी पवित्र राजगति ची पवित्र राजनीती घेऊन जनमानसात उतरायचं आहे आणि रंगकर्माला तुला या जनमानसात अमर करायचं आहे ... 
हे रंगभूमी तू नेहमीच आपल्या commitment ला जागली आहेस... 
कलाकाराने केलेल्या इच्छेची ...तू इच्छा पूर्ती केली आहेस... 
आता तुला तुझ्या चेतनेने तुझ्या शरीरातील स्नायूंना घट्ट करून पर्वताप्रमाणे तटस्थ उभं रहायचं आहे... 
हे रंगभूमी तुला हा रंगकर्मी आवाहन करत आहे...


रंगकर्मी
तुषार म्हस्के

#रंगभूमी #नाटक #थिएटरऑफरेलेवन्स #कलाकार #विचार #प्रेरणा

Thursday 18 October 2018

‘Rajgati” creates the consciousness of changing the ‘political scenario’


2nd October, 2018 was well spent by watching a play Rajgati at Shivaji Mandir , written & directed by Manjul Bhardwaj ,  Initiator & practitioner of  Theatre of Relevance philosophy.

The play ” Rajgati ” very beautifully recreated the pre independence fighting for freedom struggle  & post-independence happenings in chronological order to show the deteriorated state of affairs in AZAD India. During freedom struggle each and every Indian fought against the Goras & their only agenda was to free the country from the clutches of Britishers. The people …. Men, women, young boys & young girls of all religion/caste & strata fought equally to achieve the common goal. Then how cum today the country stands divided into man, woman, different religions, castes fighting against each other.
It is really sad that generation today cannot differentiate between Bhagat Singh, Gandhi ji & B.R. Ambedkar. It is then understood that they don’t know the who’s who of the country’s freedom fighters & what roles did they play in freedom struggle against Britishers. Who is Karl Marx?  Why Understanding of his theory is important. Is Karl Marx relevant today? Is this the time to review the implementation of his theory to improve socio -economic situation of the country or world?



India was always an agricultural based country. So lot could have been done if right policies were introduced. Farmers are going hungry inspite of having their own farms. The play highlights the plight of farmers. How globalization is a conspiracy against Indian farmers, youth & development.  Generations passed by without jobs. Literacy levels dropped & moral values eroded.

What is patriotism???? Is the most asked n confused question!!!

The women empowerment needs to be redefined now and after 72 years of being independence, women face the worst….  lack of opportunities, rapes, violence & still economically dependent.

Is this the India, we fought for, for so many years & suffered!

This 90 minutes play is very well written & directed, will help today’s generation to understand the political journey of 72 years of free India from time to time, changes & changing faces of the politicians & the politics.

The cast Ashwini Nandedkar, Sayali Pawaskar, Komal Khamkar,Yogini Chowk, Tushar,Swati Hrushikesh Patil, Prasad Khamkar,Priyanka Kamble & Sachin Gadekar were very energetic throughout the play and these  young performers so good in memorizing the lines and delivering range of characters at ease were in sync with the director’s vision.

The format of the play is not stuck with rudiments of typical theatrics & enables it to perform anywhere.

I am sure Manjul Bhardwaj will take this political reformative play to the Young generation, student’s community & create awareness for rightful thinking about Politics to save the idea of India!!!
Audience Review by:  -Sangita Kheora Thakur






Sunday 7 October 2018

रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांचे " राजगति " हे नाटक माझ्या मनातील अवस्थेचे बोलके स्वरूप वाटले .....विरेंद्र गुल्हाणे



२ ऑक्टोबर २०१८ च्या आधी माझ्या आयुष्यात अनेक वर्षे गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंत्या बघितल्या परंतु या वर्षीचा अनुभव काही निराळाच होता . बऱ्याच वर्षापासून समाजात असलेली विषमता याबाबत मनामध्ये बरीच खदखद आहे . " राजगति " हे नाटक या माझ्या मनातील अवस्थेचे बोलके स्वरूप वाटले . मी पन्नास टक्के कर्णबाधित असून सुद्धा ,सर्व रंगकर्मींनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांचा आशय माझ्या पर्यंत पोहचला.


आयुष्यात खुप कमी प्रसंग आले की जिथे मी भावुक झालो . नाट्यगृहातील हे नव्वद मिनिटे त्या प्रसंगामध्ये समाविष्ट झालो. या नव्वद मिनिटाला प्रत्येक क्षण हा अंतर्मुख करणारा होता. मनातील खदखद दृश्यरूपाने समोर दिसत होती. परंतू मार्क्सच्या अर्धवट सिद्धांताप्रमाणे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिली.याबाबत सखोल चिंतनाची व मार्गदर्शनाची गरज मनाला भेडसावू लागली . 
" राजागति " नाटक सादर करण्यामागची आपली भावना व हेतू साध्य झाले पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा !




विरेंद्र गुल्हाणे





Friday 5 October 2018

संविधानिक व्यवस्था निर्माणासाठी राजनैतिक परीदृश्य बदलण्याची चेतना प्रेक्षकांमध्ये जागवते मंजुल भारद्वाज लिखित व दिग्दर्शित नाटक "राजगति" - कुसुम त्रिपाठी (प्रखर नारीवादी आणि सांस्कृतिक आंदोलनांची अध्येता)



2 ऑक्टोबर ला मी शिवाजी नाटय मंदिर दादर येथे, मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक "राजगति" पाहायला गेले.
"थिएटर ऑफ रेलवन्स" रंगदर्शनाचे नाटक "राजगति"
समता..न्याय..मानवता आणि संविधानिक व्यवस्था निर्माणासाठी राजनैतिक परीदृश्य बदलण्याची चेतना प्रेक्षकांमध्ये जागवते. 90 मिनिटे हे नाटक प्रेक्षकांना उत्तेजित आणि उद्वेलीत करते. सामान्य माणसाला विचार करण्यास प्रेरित करते. 

नाटक देशातील सामान्य माणसापासून सुरू होते, शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला..सर्व वर्गातील लोकं राजनीतीला वाईट म्हणतात आणि सर्व राजनीती पासून दूर राहण्याची गोष्ट करतात. सामान्य व्यक्ती लोकशाहीचा अर्थच समजून घेत नाही, सामान्य जनतेला ठाऊक नाही त्यांच्या एका मताने सरकार बनते. मंजुल यांनी नाटकात स्वातंत्र्याच्या आधीचा काळ आणि स्वातंत्र्या नंतरची सद्य स्थिती अगदी वाखाणण्याजोगी दर्शवली आहे. मंजुल यांनी चार धारा म्हणजे गांधी, भगत, आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या आंदोलनांना दाखवले आहे. देश स्वतंत्र होतो, अहिंसा..शांती...न्याय...समता या आधारांवर आणि संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर देश पुढे वाटचाल करतो. नंतर 90 च्या दशकात देशात मंडल... कमंडल...व भूमंडल ची राजनीती चालवली जाते.

मुळात देशात रोजगारच नाहीत आणि स्वर्ण वर्णीय युवा समजतात की आरक्षणा मुळे आम्ही बेरोजगार आहोत. या मुद्यावरून दोन समुदायात दंगल होते आणि याच दरम्यान भूमंडलीकरण सरकारी नोकऱ्या कमी करत आहे. गिरण्या - कारखाने बंद केले जात आहेत, शेतकरी विरोधात नीती लागू केल्या जात आहेत. या सगळ्यात दलित समुदाय (राजनीती) विस्कळीत होतो, कम्युनिस्ट पक्षाचे अयशस्वी होणे, जनतेचा मोहभंग... भूमंडलीकरणाच्या नफा आणि नफा यावर आधारित अर्थ व्यवस्थेने उपभोक्तावादी संस्कृतीला जन्म दिला, परिणाम स्वरूप कामगार, शेतकरी यांचे शोषण, 
महिलांवर अत्याचार वाढणे, बलात्कार वाढणे... एका बाजूला महिलांना विश्व सुंदरी बनवायचे तर दुसऱ्या बाजूला 'बेटी बचाव बेटी पढ़ाओ' असा तथाकथित नारा... शेतकऱ्यांची आत्महत्या...सरकार ची हुकूमशाही मनोवृत्ती..लूट-खसोट वर आधारित अर्थतन्त्र...लोकतंत्राचा गळा दाबला जात आहे.
या सगळ्यांमध्ये जनतेला लोकतांत्रिक अधिकाऱ्यांचे सकारात्मक उपयोग करण्याचे मार्गदर्शन केले आहे. 
सगळे कलाकार अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, स्वाति वाघ, हृषिकेश पाटिल, प्रियंका कांबळे, प्रसाद खामकर आणि सचिन गाडेकर यांनी उत्कृष्ट रित्या आपली जबाबदारी निभावली आहे. 
मंजुल भारद्वाज यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन !


कुसुम त्रिपाठी 

(प्रखर नारीवादी आणि सांस्कृतिक आंदोलनांची अध्येता)

Thursday 4 October 2018

बाबासाहेब फक्त स्मारकापर्यंत मर्यादित नाहीत ...तुषार म्हस्के

माननीय फडणवीस साहेब आपण भाषणात काय बोलत आहात याचं थोडं तरी भान ठेवा ...डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही राज्य , देश गहाण ठेवण्याची गोष्ट केली नाही. आपण तर , बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवण्याची भाषा वापरता ... बाबासाहेब  आंबेडकरांनी कधीही स्वतः ची वाहवा आणि अस्मिता उंचावण्यासाठी राज्य गहाण ठेवण्याची भाषा वापरली नाही... मात्र , आपल्या बोलण्यामध्ये एवढंच दिसत आहे. 


सामान्य जनतेची मन जिंकण्यासाठी आपण आपल्या मनाला वाटेल ते शब्द बोलता ... ज्या व्यक्तीने संविधान सम्मत देश निर्माण करण्यासाठी ... संविधानाची निर्मिती केली ... ते काही राज्य गहाण ठेवून आपले स्मारक बांधण्यासाठी नाही... हो, आम्हांला बाबासाहेब आंबेडकरांचा आदर आहे ... कारण, त्यांना आम्ही विचार मानतो... न्यायसंगत व्यवस्था , संविधान सम्मत व्यवस्था निर्माण करण्यासाठी आंबेडकरांनी काळाला बांधले आणि संविधान देशासाठी दिले ... जन्माच्या संयोगाला आवाहन करून त्यांनी जातीभेद संपवला ...बाबासाहेब फक्त स्मारकापर्यंत मर्यादित नाहीत .. ते प्रत्येक भारतामध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात विचारातून जिवन्त राहणे गरजेचे आहे... तुम्ही स्मारक कितीही बनवा त्याच्यात आम्हांला वाद नाही ... फक्त लोकांचे मन आकर्षित करण्यासाठी आपण ज्या शब्दांचा उपयोग करत आहात. ते बाबासाहेब आंबेकरांच्या विचारधारणेच्या विरुद्व आहे... बाबासाहेबांनी गुलामगिरी संपवली आणि प्रत्येक शोषित व्यक्तीला त्याच्या मनात मान ,सन्मान मिळवून दिला ... आपण , पुन्हा महाराष्ट्र्र गहाण ठेवू अशी भाषा वापरता तेही बाबासाहेबांचा नाव घेऊन ते पुन्हा गुलामगिरीत घेऊन जाण्यासारखे आहेत ... 
कोणताही राजकीय नेता ज्याने देशासाठी आपलं जीवन अर्पण केलं . ते केवळ त्यांचे स्मारक निर्माण व्हावेत म्हणून नाही तर समाजामध्ये असणारा भेद संपावा  आणि एक आदर्श समाज आणि व्यवस्था निर्माण व्हावी. त्यामुळे, प्रत्येक ठिकाणी आपली प्रसिद्धी व्हावी म्हणून जे आपण भाषण करत आहात त्याच्यात आम्हांला विरोध नाही . पण, त्या राजकीय चरित्राच्या विचारांच्या विरुद्ध असू नये.  आता याचा जनतेनेही जरा विचार करावा . 
राजकारण , कधीही वाईट नसते ...राजकीय व्यक्ती आपली जबाबदारी आणि विचारधारा यांना विसरून स्वहितासाठी भाषण करून वाहवा  मिळवतात ... आणि राजकारण, त्यात घाण होत जाते . आता , वेळ आली आहे जनतेने राजकीय व्यक्तींना प्रश्न विचारण्याची ... 
जनहितार्थ जारी ... 

तुषार म्हस्के 

Monday 1 October 2018

सुप्रसिद्ध रंग चिन्तक मंजुल भारद्वाज का नाटक “राजगति” 2 अक्टूबर,2018,मंगलवार सुबह 11 बजे “शिवाजी नाट्य मंदिर” में मंचित होगा!



“थिएटर ऑफ रेलेवन्स” अभ्यासक एवम् शुभचिन्तक आयोजित नाटक “राजगति” 2 अक्टूबर,2018,मंगलवार सुबह 11 बजे “शिवाजी नाट्य मंदिर” दादर(पश्चिम), मुंबई में मंचित होगा! सुप्रसिद्ध रंग चिन्तक मंजुल भारद्वाज लिखित और निर्देशित नाटक “राजगति” समता,न्याय,मानवता और संवैधानिक व्यवस्था के निर्माण के लिए ‘राजनैतिक परिदृश्य’ को बदलने की चेतना जगाता है,जिससे आत्महीनता के भाव को ध्वस्त कर ‘आत्मबल’ से प्रेरित ‘राजनैतिक नेतृत्व’ का निर्माण हो।“

कब : 2 अक्टूबर,2018,मंगलवार सुबह 11 बजे

कहाँ : “शिवाजी नाट्य मंदिर”, दादर(पश्चिम), मुंबई

कलाकार:अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के ,स्वाति वाघ एवम् अन्य कलाकार।

अवधि :120 मिनट



नाटक 'राजगति', : “नाटक राजगति ‘सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र और राजनीति’ की गति है. राजनीति को पवित्र नीति मानता है.राजनीति गंदी नहीं है के भ्रम को तोड़कर राजनीति में जन सहभागिता की अपील करता है. ‘मेरा राजनीति से क्या लेना देना’ आम जन की इस अवधारणा को दिशा देता. आम जन लोकतन्त्र का प्रहरी है. प्रहरी है तो आम जन का सीधे सीधे राजनीति से सम्बन्ध है.समता,न्याय,मानवता और संवैधानिक व्यवस्था के निर्माण के लिए ‘राजनैतिक परिदृश्य’ को बदलने की चेतना जगाता है,जिससे आत्महीनता के भाव को ध्वस्त कर ‘आत्मबल’ से प्रेरित ‘राजनैतिक नेतृत्व’ का निर्माण हो।“


नाटक “राजगति” क्यों ?

हमारा जीवन हर पल ‘राजनीति’ से प्रभावित और संचालित होता है पर एक ‘सभ्य’ नागरिक होने के नाते हम केवल अपने ‘मत का दान’ कर अपनी राजनैतिक भूमिका से मुक्त हो जाते हैं और हर पल ‘राजनीति’ को कोसते हैं ...और अपना ‘मानस’ बना बैठे हैं की राजनीति ‘गंदी’ है ..कीचड़ है ...हम सभ्य हैं ‘राजनीति हमारा कार्य नहीं है ... जब जनता ईमानदार हो तो उस देश की लोकतान्त्रिक ‘राजनैतिक’ व्यवस्था कैसे भ्रष्ट हो सकती है ? .... आओ अब ज़रा सोचें की क्या बिना ‘राजनैतिक’ प्रकिया के विश्व का सबसे बड़ा ‘लोकतंत्र’ चल सकता है ... नहीं चल सकता ... और जब ‘सभ्य’ नागरिक उसे नहीं चलायेंगें तो ... बूरे लोग सत्ता पर काबिज़ हो जायेगें ...और वही हो रहा है ... आओ ‘एक पल विचार करें ... की क्या वाकई राजनीति ‘गंदी’ है ..या हम उसमें सहभाग नहीं लेकर उसे ‘गंदा’ बना रहे हैं हम सब अपेक्षा करते हैं की ‘गांधी , भगत सिंह , सावित्री और लक्ष्मी बाई’ इस देश में पैदा तो हों पर मेरे घर में नहीं ... आओ इस पर मनन करें और ‘राजनैतिक व्यवस्था’ को शुद्ध और सार्थक बनाएं ! समता,न्याय,मानवता और संवैधानिक व्यवस्था के निर्माण के लिए ‘राजनैतिक परिदृश्य’ को बदलने की चेतना को जगाएं ,ताकि आत्महीनता का भाव ध्वस्त हो और ‘आत्मबल’ से प्रेरित ‘राजनैतिक नेतृत्व’ का निर्माण हो।

“थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य दर्शन विगत 26 वर्षों से फासीवादी ताकतों से जूझ रहा है । भूमंडलीकरण और फासीवादी ताकतें ‘स्वराज और समता’ के विचार को ध्वस्त कर समाज में विकार पैदा करती हैं जिससे पूरा समाज ‘आत्महीनता’ से ग्रसित होकर हिंसा से लैस हो जाता है. हिंसा मानवता को नष्ट करती है और मनुष्य में ‘इंसानियत’ का भाव जगाती है कला. कला जो मनुष्य को मनुष्यता का बोध कराए...कला जो मनुष्य को इंसान बनाए! “थिएटर ऑफ़ रेलेवंस”... एक चौथाई सदी यानी 26 वर्षों से सतत सरकारी, गैर सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग या किसी भी देशी विदेशी अनुदान से परे. सरकार के 300 से 1000 करोड़ के अनुमानित संस्कृति संवर्धन बजट के बरक्स ‘दर्शक’ सहभागिता पर खड़ा है हमारा रंग आन्दोलन.. मुंबई से मणिपुर तक!

लेखक –निर्देशक : 


रंग चिन्तक मंजुल भारद्वाज रंग दर्शन थिएटर ऑफ रेलेवेंस' के सर्जक व प्रयोगकर्त्ता हैं, जो राष्ट्रीय चुनौतियों को न सिर्फ स्वीकार करते हैं, बल्कि अपने नाट्य सिद्धांत "थिएटर आफ रेलेवेंस" के माध्यम से वह राष्ट्रीय एजेंडा भी तय करते हैं। 28 से अधिक नाटकों का लेखन—निर्देशन तथा अभिनेता के रूप में 16000 से ज्यादा बार राष्ट्रीय और अन्तरराष्ट्रीय मंचों पर अपनी उपस्थिति दर्ज करा चुके हैं!

दर्शक सहयोग और सहभागिता से आयोजित इस मंचन में आपके  सक्रिय सहयोग और सहभागिता की अपेक्षा !


                           विस्तृत जानकारी के लिए सम्पर्क :9820391859/etftor@gmail.com