Saturday 10 August 2019

'थिएटर ऑफ़ रेलेवंस’ नाट्य सिद्धांताच्या 28 वा सूत्रपात दिवसानिमित्त “विचार, विविधता, विज्ञान, विवेक आणि संविधान सम्मत” राजनैतिक पिढी घडविण्याचा संकल्प करत असून शिवाजी नाट्य मंदिर,दादर मुंबई मध्ये 12 ऑगस्ट ला होणार नाटक राजगति चे सादरीकरण !





नाटक : राजगति नाटकाची प्रस्तुती
कधी : 12 ऑगस्ट, 2019,
 सोमवारी, सकाळी 11 वाजता
वेळ :120 मिनिटं
कुठे : श्री शिवाजी मंदिर, दादर (पश्चिम), मुंबई
लेखकदिग्दर्शक : रंगचिंतक मंजुल भारद्वाज

कलाकार : अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के ,स्वाति वाघ, प्रियंका कांबळे, सचिन गाडेकर, सुरेखा साळुंखे, अन्य कलाकार।


उद्देश्य : 27 वर्षांआधी म्हणजे 12 ऑगस्ट, 1992 रोजीथिएटर ऑफ़ रेलेवंसनाट्य सिद्धांताचे सूत्रपात झाले होते. त्यावेळी जागतिकीकरणाचा अजगर प्राकृतिक संसाधनांना गिळंकृत करण्यासाठी आपला फणा जगभरात पसरवत होता. भांडवलशाही ने जगाला  खरेदी आणि विक्रीपर्यंत मर्यादित केले होते. भांडवलशाही सत्तेच "जागतिकीकरण" हेविचाराला कुंद, खंडित आणि मिटवण्याचे षड्यंत्र आहे. तंत्राच्या रथावर स्वार होऊन विज्ञानाच्या मूळ संकल्पनांचा विनाश करण्याचा कट रचत आहे. मानव विकासासाठी पृथ्वी आणि पर्यावरणाचा विनाश, प्रगतिशीलतेला केवळ सुविधा आणि उपभोगामध्ये बदलण्याचा खेळ आहे. फॅसिस्ट ताकदीचे परिणाम आहे जागतिकीकरण ! लोकतंत्र, लोकतांत्रीकरणाच्या संविधानिक परंपरांची खिल्ली म्हणजेजागतिकीकरण! अशा भयावह काळात माणुसकी टिकवणे एक आव्हान आहे... या आव्हानासमोर उभे आहेथिएटर ऑफ रेलेवंसनाट्य सिद्धांत.
मागील 27 वर्षांपासून सांप्रदायिक मुद्द्यावरदूर से किसी ने आवाज़ दी, बाल मजुरी वरमेरा बचपन, घरगुती हिंसेवरद्वंद्व, आपल्या अस्तित्वाचा शोध घेत अर्ध्या लोकसंख्येचा आवाजमैं औरत हूँ , ‘लिंगनिदानया विषयावर नाटकलाडली , जैविक आणि भौगोलिक विविधतेवर बी- , मानवता आणि निसर्गाच्या प्राकृतिक संसाधनांच्या खासगीकरणाच्या विरोधातड्राप बाय ड्राप : वॉटर, मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठीगर्भ , शेतकऱ्यांची  आत्महत्या आणि शेतीच्या होणाऱ्या विनाशावरकिसानों का संघर्ष , कलाकारांना कठपुतली बनवणाऱ्या आर्थिक तंत्रापासून कलाकारांच्या उन्मुक्ततेसाठी नाटकअनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स , शोषण आणि दमनकारी पितृसत्ततेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकारन्याय के भंवर में भंवरी , समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठीराजगतिनाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी लढत आहे !

मागील 27 वर्षांपासून सतत कुठल्याच सरकारी, नीम सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग किंवा कोणत्याही देशीविदेशी अनुदाना शिवाय आपली प्रासंगिकता आणि आपल्या मूल्यांच्या बळावर हे नाट्यतत्व देश विदेशात आपले अस्तित्व दाखवत आहे आणि बघणाऱ्यांना आपल्या असण्याचे औचित्य सांगत आहेत. सरकारच्या 300 ते 1000 करोडच्या अनुमानित संस्कृति संवर्धन बजेटच्या विरुद्ध प्रेक्षक सहभागितेने उभे आहे आमचे रंग आंदोलन ... मुंबई पासून मणिपूर पर्यंत!
जागतिकीकरण आणि  फॅसिस्टवादी शक्तीस्वराज्य आणि समताया विचारांना उद्धवस्त करून समाजात विकार निर्माण करतात ज्याने संपूर्ण समाजआत्महीनतेनेग्रासित होऊन हिंसक होऊन जातो. हिंसा मानवतेला नष्ट करते आणि कला मनुष्यातमाणुसकीचाभाव जागृत करते. कला, जी माणसाला माणुसकीचा बोध देतेकला ती, जी माणसाला माणूस बनवते !
 


संपूर्ण जगात आता अवकळा पसरली आहे. जागतिकीकरणाच्या अफुने तर्काला नष्ट करून माणसाला आस्थेच्या पुढ्यात नेऊन ठेवले आहे. निर्मम आणि निर्लज्ज भांडवलशाही सत्ता मानवतेला पायाखाली चिरडत आहे. विकास पृथ्वीला गिळत आहे. विज्ञान तंत्राच्या बाजारात देहविक्री सम विकले जात आहे. भारतात याची उदाहरणे टोकावर आहेत आणि समजण्या पलीकडे आहेत. चमकणाऱ्या तापमानामुळे लहान मुलांच्या मृत्यूची सुनामी आणि चंद्रयानाची भरारी. दहा लाखाचे सूट आणि वस्त्रहीन समाज. लोकतंत्राच्या सुंदरतेला कुरूप करणारे गर्दीतंत्र आणि धनतंत्र. न्यायासाठी दारोदारी भटकणारा समाजातला खालचा वर्ग आणि आपल्या अस्तित्वासाठी लढणारे सुप्रीमकोर्ट. संविधानामूळे स्वतःचे पोट भरणारे कर्मचारी आज आपल्या कर्माने राजनेत्यांची लाथ खाण्यासाठी शापित आहेत. चौथी आर्थिक महासत्ता आणि बेरोजगारांची गर्दी. जेव्हा जेव्हा मानवाचे तंत्र असफल होते, तेव्हा तेव्हा अंधविश्वास आस्थेची चादर ओढून विक्राळ रूप धारण करत, समाजाला गुंडाळून घेतो. लंपट गर्दीच्या जोरावर सत्तेत येतात आणि मीडिया पीआरओ बनते. समाज एकाफ्रोजन स्टेटमध्ये जातो. ज्याला तोडण्यासाठी माणसाला आपल्या विकारांपासून मुक्तिसाठीविचार आणि विवेकाला' जागवणे आवश्यक आहे. वैचारिकतेचे पेटंट ठेवणारे वामपंथी, जडत्व आणि प्रतिबद्धतेचा फरक नाही समजून घेत. टीकेच्या नावाखाली मारक्या बैलांसारखे उधळतातगांधीचा राजनैतिक विवेकशील वारसा मातीत कोसळला आहे. संविधान आणि मानवी मूल्यांना वाचवण्यासाठी राजनैतिक परिदृश्याला बदलण्याची आवश्यकता आहे.


याच क्रमाप्रमाणे सुप्रसिद्ध रंग चिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटकराजगतिसमता, न्याय, मानवता आणि संवैधानिक व्यवस्थेच्या निर्माणासाठीराजनैतिक परीदृश्याला' बदलण्याची चेतना जागवते.
 


नाटक "राजगति" सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीती' ची गति आहे. राजनीति ला पवित्र नीति मानत आहे. राजनीति घाणेरडी आहे, या भ्रमाला तोडून राजनीति मध्ये जन सहभागितेची मागणी करते. ‘माझे राजनीतीशी घेणं देणं काय' सामान्य जनतेच्या या अवधारणेला दिशा देते. सामान्य जनता लोकशाहीचे पहारेकरी आहेत आणि पहारेकरी आहेत तर सामान्य जनतेचा सरळ सरळ राजनीतीशी संबंध आहे. नाटक 'राजगति' समता,न्याय,मानवता आणि संवैधानिक व्यवस्थेच्या निर्माणासाठीराजनैतिक परिदृश्याला' बदलण्याची चेतना जागवते. ज्याने आत्महीनतेचा  भाव उध्वस्त होऊनआत्मबळाने' प्रेरितराजनैतिक नेतृत्वाचा' निर्माण व्हावा.

अशा वेळी "थिएटर ऑफ रेलेवन्स" चे कलाकार समाजाच्याफ्रोजन स्टेटला तोडण्यासाठी विवेकाच्या मातीत विचारांचे अंकुर लावण्यासाठी प्रतिबद्ध आहेत .


No comments:

Post a Comment