Monday 30 January 2017

26 जानेवारी 2017 गणतंत्र दिवस माझ्या मध्ये चेतना निर्माण करणारा.....


एक जबरदस्त अनुभव कधीही स्वतःला एवढ्या विचारांच्या ताकदीमध्ये पाहिलेलं नव्हतं....आज पाहिलं आणि ऐकला माझा आवाज मी ....सृजनाच्या माउंट एवरेस्ट वरुन घेतलेली ऊर्जा आज या व्यवहारात उतरवली ... कलाकाराच्या ताकदीने , विचाराने ध्येयाला स्पष्ट केल्याने .....आज माझा performance हा विचारांचा आहे याची मला जाणीव झाली ....तू खुद्द को बदल ....तू खुद्द को बदल तभी तो जमाना बदलेगा ....दर्या कि कसम मौजो कि कसम ये ताना , बाना बदलेगा ....हा स्वता ला प्रश्न विचारणारा संवाद ....स्वतः पासून बदलाची सुरुवात करणारा प्रवास 



....अगदी सहज त्या 150 ते 160 मुलांबरोबर करणं....त्या मध्ये 18 ते 20 साधारणता मान्यवर .... विदर्भ एकता मंडळ संचालित विदर्भ विद्या मंदिर शाळा मालाड पूर्व .....या शाळेत मी 7 वी ते 10 वीत शिक्षण घेतलं....26 जानेवारी 2017 हा दिवस गणतंत्र दिवस म्हणून ओळखला जातो ....संविधान हे भारतात 26 जानेवारी पासून रुजू झाले ....
आणि लोकशाही भारतात रुजू झाली ....संविधान आणि त्याचे तत्व हे पाहताना फक्त वाचनापूरते दिसू लागले व्यवहारीजीवनात त्याचा वापर दिसतो कि नाही हा प्रश्न आहे ....एका बाजूला राजेशाही संपली आहे ....तरीही , त्यांच्या नावावर राजकारण करून लोकप्रिय , समाजरचणीय राजाचा नाव घेऊन भोळी भाबडी जनता फक्त त्या ओघात फक्त शिवाजी जन्माला येईल आणि आम्हांला वाचवेल ...हि मानसिकता दूर करण्यासाठी संविधानातील तत्वांचा माझ्या व्यक्तिगत जीवनात किती फरक पडतो हे मांडणे महत्वाचे वाटू लागले...

.डोक्यामध्ये विचारांचा काहोर निर्माण झाला ....देशाचं भविष्य माझ्या समोर लहान ....किशोरवयीन त्या मुलां -मुलींमध्ये दिसत होते ....त्याच बरोबर भूतकाळ हा मान्यवर मंडळींच्या रूपाने मंचावर बसलेला दिसू लागला....एक विचारांची ज्योत या किशोर आणि किशोरींमध्ये पेटवायची हा विचार ....त्यामध्ये वयस्कर मंडळींना एक ऊर्जा देणं ....30 ते 40 मिनिटे झाली सर्व मंडळी भाषण देण्यात व्यस्त ....त्यामध्ये त्या मुलांच्या चेहऱ्यावर शिक्षा भोगत आहोत असा भाव जाणवू लागला .....त्यामध्ये वक्ता काय बोलतोय आणि ते प्रेक्षकांना काय समजतोय हा प्रश्न निर्माण माझ्या मनात होऊ लागला ....संस्थेकडे 10 ते 15 मिनिटे हक्काने मागून घेतली मी बोलणार .....मनात पहिलाच विचार आला ....यांच्य मध्ये ऊर्जा निर्माण करायची ....दुसरा प्रश्न आला ....आता काय बोलायचं ? संविधानाविषयी बोलताना तथाकथित माहिती सांगायची कि , ते संविधानाचे तत्व जगायला लावायचे ....त्या तत्वांची ताकद दाखवून द्यायची .....मग, एका मागून एक तत्व , विचार काय बोलणार ? काय करणार ? याची रचना माझ्या डोक्यात निर्मान झाली ....मग, उर्जेने भरलेल्या या महासागरात मी उडी मारली .....आणि त्या वातावरणाला बदलायला सुरुवात केली ...पहिला पाऊल टाकलं आणि त्याच बरोबर त्या लहान मुलांनी त्याला साद दिली ....ऊर्जेचा स्रोत म्हणजे लहान मुले


....त्यांना शब्द दिला.... हैं .... त्याच बरोबर ती लहान मुले बोलली आम्हांला हा शब्द माहिती आहे ....मनात झालं अरे , वाह ....छोट्या छोट्या गोष्टी कशा लक्षात ठेवतात हि मुले ....मग , मी शब्द हम घेतला ....आणि त्या वातावरणाला आवाज दिला ....त्याच बरोबर त्या लहान मुलांचा आवाज हा सर्वात जास्त येऊ लागला ....मग, मान्यवर मंडळींना आवाज दिला ...त्यांचा हि आवाज येऊ लागला ....असा त्या संपूर्ण शाळेच्या वातारणामध्ये " हम हैं " गुंजायमान झाला ....त्याचं बरोबर प्रश्न केला ....हि जागा कोणाची आहे ....? मग , त्यांचा उत्तर आला आमची ....मग, त्यांना सांगितले बोला ....हि जागा माझी आहे .....हे जीवन माझं आहे.....विचार करणे माझा अधिकार आहे ....निर्णय घेणे माझा अधिकार आहे .....हे बोलत असताना मुलांची बॉडी langauage बदलली ....आणि ऊर्जा त्यांच्या नसा नसांमधून वाहू लागली ....त्याच बरोबर शिक्षक वर्ग अभिमानाने माझ्याकडे पाहताना दिसू लागला त्यांच्या मनात अभिमानाने छाती फुगून यावी अशी त्यांची प्रतिमा डोळ्यांना दिसू लागली....शेवटी या उर्जेमध्ये उडी मारताना ....जबदस्त ताकद आणि ऊर्जा मला पुन्हा पुन्हा मिळाली ....ती परावर्तित होऊन माझ्याकडे येऊ लागली ....मंजुळ भारदवाज यांच्या थिएटर ऑफ रेलेवन्स या नाट्य सिद्धांताने दिलेल्या तत्वाने ....दिलेल्या सांविधानीक दृष्टीने आज हा सरळ विचार मांडता आला ...असा हा 26 जानेवारी 2017 ला गणतंत्र दिवस माझ्या मध्ये चेतना निर्माण करणारा , माझ्या समाजात चेतना निर्माण करणारा ....जाणवू लागला


रंगकर्मी 
तुषार म्हस्के

No comments:

Post a Comment