Monday 16 February 2015

जाहीर निषेद.........



अरे असे किती दिवस आम्ही फक्त लांबून पाहणार …………. किती दिवस फक्त बातम्यांनी ऐकणार …… किती दिवस फक्त चर्चा करणार । ……असे अजून किती विचारवंत या देशात मारले जाणार ………….  खूप प्रश्न समोर येतात १. का त्यांना घर नाही ? २. त्यांना संसार नाही? ३. का त्यांना मित्र मंडळी नाहीत  ? ४. का त्यांना परिवार नाही ?  का फक्त आम्हालाच सर्व आहेत ………विचारवंताना ……अभिव्यक्त स्वातंत्र नाही आहे ……… जे स्वता बरोबर इतरांना अभिव्यक्त होण्यासाठी ………. त्यांच जीवन सुरळीत ,आनंदात चालण्यासाठी …… नेहमीच कार्यरत असतात …… अशा विचारवंताना स्वतंत्र भारतात दिवसा ढवळ्या ……गोळीबार होतो …… अजून किती गोविंद पानसरे सारख्या व्यक्तीमत्वावर बंदुकीच्या गोळी ने हमले होणार ? अजून किती ? ………… आणि आम्ही फक्त बघत बसणार ……………… अस अजून चालणार नाही ……………. जाहीर निषेद ! जाहीर निषेद !जाहीर निषेध ……………… 

No comments:

Post a Comment