मत देताना विचार करा....
जल ... जंगल ... जमीन
नैसर्गिक संसाधन यांना स्वार्था साठी वापरायचे आहेत...
याचे परिणाम काय होतील त्याचा विचार करा... विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनांवर डल्ला मारणं सुरू आहे... गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्तेच्या केंद्र बिंदू मध्ये असणारे सत्ताधिश जनतेची दिशाभूल करत आहेत... जनतेला भावनिक गोष्टींचा खुराक देऊन सत्तेत यायचं आणि नैसर्गिक संसाधन आणि नैसर्गिक ठेवा ... भांडवल दाराच्या घशात टाकायचा... नक्की हे प्रकरण काय सुरू आहे... ? याचा भारतातील मालकांनी म्हणजेच जनतेने विचार करायला हवा... पण, अर्थात माणसाच्या भावना ह्या शून्य झाल्यात... स्वतःच मत, स्वतःची भूमिका राहिली नाही... हा निसर्ग आणि पर्यावरण राहिला नाही तर आपण श्वास कसा घेणार ?
आपला नाहीतर पुढच्या पिढी चा विचार करा... तुम्ही ज्यांना निवडून देता त्यांचा विचार नका करू ... त्यांच्या नावाने विदेशात घर आहेत... जागा आहे... त्यांची मुलं तिकडे शिफ्ट होतील... मात्र आमची मुलं श्वास घेण्यासाठी तरसतील...
विचार करा ....!
तुषार म्हस्के

